शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नंदोरी मार्गावरील जड वाहतूक धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:53 IST

शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धन संस्था व नागरिकांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. त्याचबरोबर भैय्याजी साळवे विद्यालय, गुरुकुल कॉन्व्हेन्ट, रडर शाळा, बँका आणि इतर कार्यालयेही आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारीही मोठ्या प्रमाणात असते. गत १-२ वर्षांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. यामुळे येथील रहिवास्यांना तसेच ग्रामीण भागातून येणाºया जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.याच काळात या रस्त्यावर अनेक दुर्घटना घडल्या. सावली येथील घटना, एस. टी. बस विहिरीत जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हेटी (सावंगी ) येथील गजानन भोयर यांचा टिप्परच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या अपघाताला प्रसाशनच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. हा रस्ता जड वाहतुकीकरिता नसताना यावरून वाहतूक सुरू असून वाहन चालकांवर कुठलीही कार्यवाही होत नाही. काही वाहन चालक टोल वाचवीण्याकरिता या रस्त्याचा वापर करीत आहेत. याला लवकरात लवकर अटकाव बसावा यासाठी आ. समीर कुणावार यांना पर्यावरण संवर्धन संस्था तथा नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. कुणावार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित मुख्य अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ, चंद्रपूर यांना याबाबतचे पत्र पाठवून अवगत केले.सदर निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, हिंगणघाट, आरटीओ आदि विभागाला देण्यात येणार आहे. यावेळी समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहने, नगर सेवक आशिष पर्बत, राजू कामडी, पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर, ज्वलंत मून, मनोज वरघणे, गणेश भोयर इत्यादी उपस्थित होते.