शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुसळधार पावसाचा वर्धेकरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 05:00 IST

बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी सकाळी ढगाळी वातावरण असतानाच, दुपारी अचानक वातावरणात बदल होत, वर्धा शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे वर्धा शहरातील छोटे, मध्यम व मोठ्या नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. अशातच काही भागांत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रामनगर जैन मंदिर परिसर, हिंदनगर, गौरक्षण वॉर्ड, मालगुजारीपुरा, भामटीपुरा,  स्टेशनफैल, बॅचलर रोड, कृष्णनगर, पोद्दार बगीचा, म्हाडा कॉलनी आदी भागातील तब्बल ३२८ व्यक्तींच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत पावसाचे पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे. 

जनजीवन विस्कळीत : अन्नधान्याची नासाडी- शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात चांगलाच कहर केला. अशातच नगरपालिकेचा दुर्लक्षितपणाही चव्हाट्यावर आला असून अनेकांच्या घरात नालीतील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पालिकेने याची गंभीर दखल घेण्याची नितांत गरज आहे. शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयामागील राधानगर परिसरातील रहिवासी आशा काकडे यांच्या घरात सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाली. नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामात हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागल्याचे दिसून येत आहे. परिसरातील नालीची साफसफाई न केल्याने तसेच त्या नालीचा प्रवाह मोकळा न केल्याने नालीतील पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरत आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर