शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

मुसळधार पावसाचा वर्धेकरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 05:00 IST

बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी सकाळी ढगाळी वातावरण असतानाच, दुपारी अचानक वातावरणात बदल होत, वर्धा शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे वर्धा शहरातील छोटे, मध्यम व मोठ्या नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. अशातच काही भागांत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रामनगर जैन मंदिर परिसर, हिंदनगर, गौरक्षण वॉर्ड, मालगुजारीपुरा, भामटीपुरा,  स्टेशनफैल, बॅचलर रोड, कृष्णनगर, पोद्दार बगीचा, म्हाडा कॉलनी आदी भागातील तब्बल ३२८ व्यक्तींच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत पावसाचे पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे. 

जनजीवन विस्कळीत : अन्नधान्याची नासाडी- शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात चांगलाच कहर केला. अशातच नगरपालिकेचा दुर्लक्षितपणाही चव्हाट्यावर आला असून अनेकांच्या घरात नालीतील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पालिकेने याची गंभीर दखल घेण्याची नितांत गरज आहे. शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयामागील राधानगर परिसरातील रहिवासी आशा काकडे यांच्या घरात सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाली. नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामात हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागल्याचे दिसून येत आहे. परिसरातील नालीची साफसफाई न केल्याने तसेच त्या नालीचा प्रवाह मोकळा न केल्याने नालीतील पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरत आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर