शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सकाळी एक मजकूर जाहीर करीत विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची कशी स्थिती राहील याबाबतची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात ५६४.१७ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर मध्यंतरी जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी झाल्याने मोसमी पाऊस आला, असा अंदाज बांधत तब्बल ४२ हजार ६९४ हेक्टरवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. तर आता पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

सप्टेंबरपर्यंत पडतो ६६७०.८४ मिमी पाऊस- वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी सुमारे ६६७०.८४ मिमी पाऊस पडतो. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५६४.१७ मिमी इतकाच पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तर आता पुढील पाच दिवस जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याने अंकुरलेले पीक करपण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अन्यथा दुबार पेरणीचे ओढवणार संकट- जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पीकही अंकुरले आहे. पण अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास पेरणीची लगीनघाई करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटच ओढवणार आहे.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उभ्या पिकांना ठिबक किंवा तुषारने सिंचन करावे. शिवाय पिकाला डवरणी करावी. तसेच कुठली अडचण येत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊस