शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सकाळी एक मजकूर जाहीर करीत विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची कशी स्थिती राहील याबाबतची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात ५६४.१७ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर मध्यंतरी जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी झाल्याने मोसमी पाऊस आला, असा अंदाज बांधत तब्बल ४२ हजार ६९४ हेक्टरवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. तर आता पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

सप्टेंबरपर्यंत पडतो ६६७०.८४ मिमी पाऊस- वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी सुमारे ६६७०.८४ मिमी पाऊस पडतो. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५६४.१७ मिमी इतकाच पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तर आता पुढील पाच दिवस जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याने अंकुरलेले पीक करपण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अन्यथा दुबार पेरणीचे ओढवणार संकट- जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पीकही अंकुरले आहे. पण अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास पेरणीची लगीनघाई करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटच ओढवणार आहे.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उभ्या पिकांना ठिबक किंवा तुषारने सिंचन करावे. शिवाय पिकाला डवरणी करावी. तसेच कुठली अडचण येत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊस