शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सकाळी एक मजकूर जाहीर करीत विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची कशी स्थिती राहील याबाबतची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात ५६४.१७ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर मध्यंतरी जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी झाल्याने मोसमी पाऊस आला, असा अंदाज बांधत तब्बल ४२ हजार ६९४ हेक्टरवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. तर आता पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

सप्टेंबरपर्यंत पडतो ६६७०.८४ मिमी पाऊस- वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी सुमारे ६६७०.८४ मिमी पाऊस पडतो. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५६४.१७ मिमी इतकाच पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तर आता पुढील पाच दिवस जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याने अंकुरलेले पीक करपण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अन्यथा दुबार पेरणीचे ओढवणार संकट- जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पीकही अंकुरले आहे. पण अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास पेरणीची लगीनघाई करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटच ओढवणार आहे.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उभ्या पिकांना ठिबक किंवा तुषारने सिंचन करावे. शिवाय पिकाला डवरणी करावी. तसेच कुठली अडचण येत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊस