शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आठवड्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी; पूर्वी 14, आता 19 महसूल मंडळांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 23:13 IST

जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातून वर्धा नदीच्या पात्रात १८६.६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. यामुळे भूगर्भासह नद्या व नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील तब्बल १९ महसूल मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस म्हणजेचे अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. ५ जुलैला जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. त्या संकटातून वर्धेकर सावरत नाहीच तो आता शनिवारी कोसळलेल्या पावसाने अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातून वर्धा नदीच्या पात्रात १८६.६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२१६ घरांचे नुकसान

-  शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला; पण याच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २१६ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. हा प्राथमिक अंदाज असून, सर्वेक्षणाअंती नेमके किती नुकसान झाले यवची इत्थंभूत माहिती पुढे येणार आहे.

अंकुरलेले पीक पाण्याखाली

-   मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. नदी व नाल्याच्या पुरामुळे नदी आणि नाल्यांच्या काठांवरील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, काही शेतांना तळ्याचेच स्वरूप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सर्वेक्षणाअंती नुकसानीची संपूर्ण माहिती पुढे येणार आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर