शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

आठवड्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी; पूर्वी 14, आता 19 महसूल मंडळांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 23:13 IST

जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातून वर्धा नदीच्या पात्रात १८६.६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. यामुळे भूगर्भासह नद्या व नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील तब्बल १९ महसूल मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस म्हणजेचे अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. ५ जुलैला जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. त्या संकटातून वर्धेकर सावरत नाहीच तो आता शनिवारी कोसळलेल्या पावसाने अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातून वर्धा नदीच्या पात्रात १८६.६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२१६ घरांचे नुकसान

-  शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला; पण याच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २१६ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. हा प्राथमिक अंदाज असून, सर्वेक्षणाअंती नेमके किती नुकसान झाले यवची इत्थंभूत माहिती पुढे येणार आहे.

अंकुरलेले पीक पाण्याखाली

-   मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. नदी व नाल्याच्या पुरामुळे नदी आणि नाल्यांच्या काठांवरील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, काही शेतांना तळ्याचेच स्वरूप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सर्वेक्षणाअंती नुकसानीची संपूर्ण माहिती पुढे येणार आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर