शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 18:42 IST

काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले.

वर्धा : दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावत शनिवारीही आपला जोर कायम ठेवल्याने नदी व नाल्यांच्या पाणी पातळीच चांगलीच वाढ झाली. अशातच काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले.

सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील नदी व नाले ओसंडून वाहत असतानाच पूराचे पाणी आष्टी तालुक्यातील लहान आर्वी, नवीन आष्टी, साहूर आणि धाडी या गावात शिरले. यामुळे अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची नासाडी झाली.

तीन महिलांसह चार पुरुषांना केले सुरक्षित रेस्क्यू

समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या मध्ये पुरामुळे तब्बल सात व्यक्ती अडकल्या. या बाबतची माहिती तालुका प्रशासनाला मिळताच युद्धपातळीवर बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. स्थानिक चमूच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या बचाव कार्यादरम्यान तीन महिला व चार पुरुषांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेल्या या व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी लाहोरीकडे जात होते. अशातच कार पुरामुळे पुलावर अडकली. तर नागरिकांच्या सहकार्याने स्थानिक चमूने शर्थीचे प्रयत्न करून दादाराव निघोट, तुळशीदास निघोट, शांताराम निघोट, सुरेश देशमुख, रमाबाई निघोड, ज्योती उखळे, गौरी निघोट, प्रमाद जोशी यांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.

हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांनाही फटका

सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील जाम नदी ओसंडून वाहत आहे. ओसंडून वाहत असलेल्या जाम नदीच्या पुराचे पाणी चार गावांत शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. तर सततच्या पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून शेतशिवारांना तळ्याचेच स्वरूप आले आहे.

निम्न वर्धाचे २३ दरवाजे उघडले

आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे २३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून वर्धा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुलावर पाणी, वाहतूक ठप्प

आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यशोदा नदी ओसंडून वाहत असून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर-अलमडोह या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर पूरपरिस्थितीमुळे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड), गिरड-मोहगाव, वडगाव-पिंपळगाव या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. आष्टी तालुक्यातील सुजातपूर-भारसवाडा या मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर पूरपरिस्थितीमुळे आष्टी-मोर्शी, चित्तूर बेलोरा-जळगाव, लहान आर्वी-अंतोरा हा मार्ग बंद झाला.

पेठअहमदपूर अन् आष्टीला फटका

आष्टी तालुक्यातील लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी थेट नदी काठावरील आष्टी पेठअहमदपूर या गावात शिरल्याने तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरwardha-acवर्धा