शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 18:42 IST

काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले.

वर्धा : दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावत शनिवारीही आपला जोर कायम ठेवल्याने नदी व नाल्यांच्या पाणी पातळीच चांगलीच वाढ झाली. अशातच काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले.

सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील नदी व नाले ओसंडून वाहत असतानाच पूराचे पाणी आष्टी तालुक्यातील लहान आर्वी, नवीन आष्टी, साहूर आणि धाडी या गावात शिरले. यामुळे अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची नासाडी झाली.

तीन महिलांसह चार पुरुषांना केले सुरक्षित रेस्क्यू

समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या मध्ये पुरामुळे तब्बल सात व्यक्ती अडकल्या. या बाबतची माहिती तालुका प्रशासनाला मिळताच युद्धपातळीवर बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. स्थानिक चमूच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या बचाव कार्यादरम्यान तीन महिला व चार पुरुषांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेल्या या व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी लाहोरीकडे जात होते. अशातच कार पुरामुळे पुलावर अडकली. तर नागरिकांच्या सहकार्याने स्थानिक चमूने शर्थीचे प्रयत्न करून दादाराव निघोट, तुळशीदास निघोट, शांताराम निघोट, सुरेश देशमुख, रमाबाई निघोड, ज्योती उखळे, गौरी निघोट, प्रमाद जोशी यांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.

हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांनाही फटका

सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील जाम नदी ओसंडून वाहत आहे. ओसंडून वाहत असलेल्या जाम नदीच्या पुराचे पाणी चार गावांत शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. तर सततच्या पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून शेतशिवारांना तळ्याचेच स्वरूप आले आहे.

निम्न वर्धाचे २३ दरवाजे उघडले

आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे २३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून वर्धा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुलावर पाणी, वाहतूक ठप्प

आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यशोदा नदी ओसंडून वाहत असून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर-अलमडोह या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर पूरपरिस्थितीमुळे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड), गिरड-मोहगाव, वडगाव-पिंपळगाव या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. आष्टी तालुक्यातील सुजातपूर-भारसवाडा या मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर पूरपरिस्थितीमुळे आष्टी-मोर्शी, चित्तूर बेलोरा-जळगाव, लहान आर्वी-अंतोरा हा मार्ग बंद झाला.

पेठअहमदपूर अन् आष्टीला फटका

आष्टी तालुक्यातील लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी थेट नदी काठावरील आष्टी पेठअहमदपूर या गावात शिरल्याने तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरwardha-acवर्धा