शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:24 IST

लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला.

ठळक मुद्देदहाव्या वर्षी हाडाचा कॅन्सर : उपचारासाठी ५ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला. मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च सांगितल्याने त्याच्या आईवडिलासह गावकरी हतबल झाले आहे.देवा श्रवणला लवकर बरे कर, म्हणत लहानआर्वी वासीयांनी श्रीरामाला प्रार्थना केली आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी श्रवणच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची मागणी त्याच्या आई वडिलांनी केली आहे. लहानआर्वी येथील घनश्याम गायकी हे भूमिहीन कुटुंब, शेतमजुरी करून ते, पत्नी, मुलगा व मुलगी असा संसार चालवित होते. मुल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. अत्यल्प मजुरी या परिवाराच्या दोन वेळची भुक भागविण्याकरिता पुरेसी ठरत होती. सर्व सुरळीत असताना घनश्याम यांचा मुलगा श्रवण अचानक हाताच्या दुखण्याने रडू लागला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी मोठा आजार आहे म्हणत अमरावती नेण्याचा सल्ला दिला. तेथे पूर्ण निदान लागले. श्रवणच्या हातामधील मोठ्या हाडात कॅन्सर झाला आहे. हे ऐकूण आईवडील ढसाढसा रडत श्रवणला घेवून लहानआर्वी आपल्या घरी आले. नातलगांना सांगितले. गाकºयांसामोर आपबिती कथन केली.सर्वांच्या लाडाचा श्रवण एकाएकी अंधरुणावर खिळला, सारे गाव सुन्न झाले. सरपंच सुनील साबळे यांनी श्रवणच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. श्रवणवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याकरिता पाच लाखांचा खर्च आहे. एवढी रक्कम आणायची कुठून या चिंतेने कुटुंबाला ग्रासले.गावातील काहींनी मदतीचा हात देवू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते व समाजातील दानशुरांनी श्रवणच्या शस्त्रक्रियेला मदत करून हातभार लावावा, असे वडील घनश्याम यांनी आवाहन केले आहे.पहिली मदत गावकºयांनी केलीश्रवणसाठी गावकºयांनी आर्थिक मदत करून नागपूरला भरती केले. सर्व उपचार करून झाले. आता शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच उरला नाही. त्यामुळे पाच लाख एवढी रक्कम उभी करण्याचे आवाहन आहे. श्रवणचा आजार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास काही विपरीत घडू शकते. त्यासाठीच सर्वांचा आटापिटा सुरू आहे.