शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

आरोग्य कर्मचाऱ्यांनो एकजूट राहा

By admin | Updated: December 30, 2014 23:42 IST

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक समस्या त्यांना सतावत आहे. त्यामुळे एकजूट राहा, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे विचार महाराष्ट्र जिल्हा

अरुण खरमाटे : जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अधिवेशनवर्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक समस्या त्यांना सतावत आहे. त्यामुळे एकजूट राहा, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे विचार महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांनी मांडले.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद सभागृह सभागृहात आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा अधिवेशन पार पडले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश माळी यांनी केले. यावेळी सुजाता कांबळे, विजय जांगडे, रतन बेडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, विभागीय सचिव नलिनी उबदेकर आदी उपस्थित होते. शासन इतिवृत्तानुसार मंजूर केलेल्या सर्व मागण्याबाबत आदेश निर्ममित करण्याबाबत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करून वेतन त्रुटी दूर करणे, डॉ. खानंदे समितीच्या अहवालानुसार कारवाई करणे, महाराष्ट्र विकास श्रेणीत पदोन्नती देण्याकरिता आरोग्य पर्यवेक्षकांच्या ज्येष्ठता याद्या करण्याचे निर्देश मा. आयुक्तांना देण्यात यावे, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना किमान वेतनानुसार १५ हजार रुपये देण्यात यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मंजूर मुख्य लेखाशिर्ष २२११ कु. कल्याण २२१० पटकी नियंत्रण प्रतिबंधक योजनेतील मंजूर पदे त्वरित भरा, कुष्ठरोग तंत्रज्ञ यांना आश्वासित कालबद्ध पदोन्नती व अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देण्यात यावी, आरोग्य कर्मचारी संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, एन.आर.एच.एम. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून सेवा सोयी लागू करावी आदी मागण्यांवर यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव सिद्धार्थ तेलतुबंडे यांनी केले. संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व सचिव सुरेश माळी, वसंत बाचलकर, अशोक वाघ यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या १५ दिवसात निकाली न निघाल्यास कठोर पावले उचलली जातील असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन उदय साळवे यांनी केले. आभार प्रभाकर सुरतकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता निलेश साटोणे, श्याम जीवतोडे, प्रकाश मुरमे, विकास माणिकमुळे, सोमेंद्र कांबळे, भीम खुडे, सुरेश ताकसांडे, अतुल शेंडे, दिलीप धुडे, जोशी कांबळे, श्याम जोशी भगत, चंद्रकांत वाघुले, प्रशांत आदमणे, साधना रामटेके, शाले कौरती, लता भगत, लीना चौधरी, ए.व्ही.सहारे, एस.एन. वीरपाते, वंदना गराड, जिजा नेहारे, मंदा शर्मा, विठ्ठल केवटे, राजेंद्र धरमठोक, चंद्रशेखर वरकड, डगवार, यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी )