शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

By अभिनय खोपडे | Updated: October 27, 2023 16:07 IST

वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर  तिसऱ्या दिवशी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा  भ़जन आंदोलन केले.

वर्धा :  राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबर पासून आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी बेमुदत कामबंद केल्या मुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात ३५ हजार आरोग्य विभागातील विविध संवर्गातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद करून संपात सहभागी  झाले असल्यामुळे राज्यभर आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाले आहे.

वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर  तिसऱ्या दिवशी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा  भ़जन आंदोलन केले. मागील  वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत महाराष्ट्रातील आरोग्य विभागात हजारो पदरिक्त आहेतम्हणून महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची धुरा ही कंत्राटी कर्मचाऱ्यावर आहे.

ओरिसा राजस्थान पंजाब मणिपूर मेघालय  झारखंड  आंध्रप्रदेश या राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध विभागातील रिक्त पदावर सामावून घेण्यात आलेले आहे तर मध्यप्रदेश येथे त्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे अनेक वर्षापासून महाराष्ट्रात ही मागणी असताना महाराष्ट्र सरकारने अजूनही विचार केलेला नाही याबाबत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने अनेकदा आंदोलन केलेत चार वेळा मंत्रालयात आरोग्य मंत्री यांच्यासोबत चर्चा झाली.

आरोग्य मंत्री यांनी सरकार सकारात्मक आहे ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झाली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सामावून घेण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्ते  व. विधानसभेच्या बजेट सत्रात सरकारकडून देण्यात आले परंतु अजून पर्यंत कुठलाही  धोरणात्मक निर्णय घेतलेला नसल्यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यात एक नैराश्य निर्माण झालेली आहे त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी कृती समिती  निर्माण करुन समायोजनाच्या मागणीसाठी बेमुदत संप २५ ऑक्टोबरपासून सुरू केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी समायोजन. कृती समिती मुख्य मार्गदर्शक दिलीप उटाणे, प्रवीण बोरकर मुख्य समन्वयक पवन वासनिक, कोरोना काळात याच कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःची परवा न करता काम केलेले आहे त्यामुळेच कोरोना सारखा संकट थांबवू शकलो महाराष्ट्र सरकारने तत्काळ समायोजनाबाबत कार्यवाही करून व धोरणात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी  विनंती आयटक व कृती ने सरकारला  केली आहे .

टॅग्स :wardha-acवर्धा