शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आरोग्य सेवेकरिता करावी लागते १० किमीची पायपीट

By admin | Updated: February 9, 2015 23:19 IST

बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास

बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास नागरिकांना सेलू येथे जाण्याखेरीज गत्यंतर नसते. हिंगणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना १० किमी अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. हिंगणी ग्रामपंचायत अंतर्गत धामणगाव, शिवणगाव, वानरविहरा, देवनगर या गावांचा समावश होतो. तर एक किमी अंतरावर असलेल्या किन्ही, मोही, ब्राह्मणी या गावाचा यात समावेश आहे. शासनाने येथे अ‍ॅलोपॅथिक दवाखाना सुरू केला आहे. परंतु उपचार करून घेण्यासाठी सेलू येथे ग्रामीण रूग्णालयात जाण्याखेरीज पर्याय नसतो. जंगलव्याप्त भागात असलेल्या सालई (कला) येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या गावातील नागरिकांना सालई येथे जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. हिंगणी गावापासून दोन कि.मी अंतरानंतर व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. या परिसरात हिंसक श्वापदांचा सातत्याने वावर असतो. अनेकदा जंगली श्वापदांकडून मानव व पशुंवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बोर अभयारण्याकडे जाण्याकरिता हाच मार्ग आहे. पर्यटन स्थळाकरिता बोर गावावरून मार्ग जात असून किरकोळ अपघात होतात. अशा स्थितीत जखमींना सेलू येथे नेऊनच उपचार करावे लागतात. सेलू येथील ग्रामीण रूग्णालयाचे बोरधरण येथून १५ किमी आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना उपचार करून घेणे अवघड जाते. नाहक आर्थिक भुर्दंड व प्रवासाचा भार सहन करावा लागत आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)