शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मातोश्री वृद्धाश्रमातील १८६ वृद्धांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: December 21, 2015 02:25 IST

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेच्या नागरी आरोग्य केंद्राद्वारे मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा : सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाच्या नागरी आरोग्य केंद्राचा उपक्रमवर्धा : सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेच्या नागरी आरोग्य केंद्राद्वारे मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला सुमारे २६० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १८६ वृद्धांच्या आरोग्याची तपासणी केली. शिवाय आवश्यक त्यांच्यावर उपचार करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी व डॉ. सुशिला नायर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून आरोग्य केंद्राचे प्रभारी प्रमोद बहुलेकर यांनी डॉ. सुशिला नायर यांच्या कार्याची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे पाहण्याची गरज का आहे, हे सांगताना आपली सरासरी आयुर्मर्यादा १९५१ मध्ये केवळ ४२ वर्षे होती. ती आता ६८ वर्षांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. आपल्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानाचे स्थान दिले जात असे. सरकारने ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याणासाठी अनेक कायदे केले आहेत; पण केवळ कायदे बनवल्याने समस्या सुटणार नाही, असे सांगितले.आधारवडचे अध्यक्ष श्यामकांत देशपांडे यांनी हिवाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष देशमुख यांनी वृद्धाश्रमाची तसेच समाजाच्या हिताकरिता संस्काराची गरज का आहे, हे पटवून दिले. याप्रसंगी सिंदी मेघेच्या सरपंच सुषमा येसनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अश्विनी कलंत्री यांनी उच्च रक्तदाबाची कारणे व उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.मेळाव्यात आयसीएमआर प्रकल्पाच्या कार्यकर्र्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यांचे निराकरण यावर आधारीत ‘कुटुंबाचा आधार’ ही नाटिका सादर केली. सिंदी मेघेच्या एका बचत गटाने वृद्धांच्या समस्या मांडल्या. शिवाय पपेट शोही सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अलका खेडकर यांनी केले तर आभार अतुल कातरकर यांनी मानले. मेळाव्याला प्रभाकर डोरले, विद्या शेंडे, शोभा खांदेतोड, रोटा तसेच आयसीएमआर प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)