शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे नामफलकाला दोर बांधून घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वारंवार निवेदन देऊनही पिपरी (पारगोठान) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासह पुनर्वसित भागातील विविध प्रश्न निकाली काढण्यात आले नसल्याचा आरोप करीत विविध समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सूरज घायवट या आंदोलनकर्त्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोराने गळफास लावून ‘मला मरायचे नाही... वाचवा’ अशी आर्त हाक दिली.एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा. सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसनमधील लाभार्थ्यांना मागील सहा वर्षांपासून लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली. पण प्रत्यक्षात गरजूंना लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तर पिपरी पारगोठान येथील प्रकल्पग्रस्त रमेश गेटमे यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. परंतु, त्यांना अजूनही जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. या तिन्हीप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात नावेद पठाण, प्रीतम कातकिडे, सूरज घायवट, सिराज पठाण, अमित मांडरे, शुभम भोयर, भूषण येलेकार, ऋषिकेश पाचकवडे, आशिष अंभोरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका

- जिल्हा कचेरीतील आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या चमूसह आंदोलनस्थळ गाठले. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशन येथे नेले. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत उडाली खळबळ- आंदोलनकर्त्यांनी दुपारी १२.०२ वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन गाठून घोषणाबाजी केली. दरम्यान, एका आंदोलनकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोर बांधून गळफास घेत मला वाचवा, अशी आर्त हाक दिली. एकूणच या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

 

टॅग्स :agitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी