शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे नामफलकाला दोर बांधून घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वारंवार निवेदन देऊनही पिपरी (पारगोठान) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासह पुनर्वसित भागातील विविध प्रश्न निकाली काढण्यात आले नसल्याचा आरोप करीत विविध समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सूरज घायवट या आंदोलनकर्त्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोराने गळफास लावून ‘मला मरायचे नाही... वाचवा’ अशी आर्त हाक दिली.एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा. सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसनमधील लाभार्थ्यांना मागील सहा वर्षांपासून लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली. पण प्रत्यक्षात गरजूंना लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तर पिपरी पारगोठान येथील प्रकल्पग्रस्त रमेश गेटमे यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. परंतु, त्यांना अजूनही जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. या तिन्हीप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात नावेद पठाण, प्रीतम कातकिडे, सूरज घायवट, सिराज पठाण, अमित मांडरे, शुभम भोयर, भूषण येलेकार, ऋषिकेश पाचकवडे, आशिष अंभोरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका

- जिल्हा कचेरीतील आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या चमूसह आंदोलनस्थळ गाठले. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशन येथे नेले. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत उडाली खळबळ- आंदोलनकर्त्यांनी दुपारी १२.०२ वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन गाठून घोषणाबाजी केली. दरम्यान, एका आंदोलनकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोर बांधून गळफास घेत मला वाचवा, अशी आर्त हाक दिली. एकूणच या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

 

टॅग्स :agitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी