शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

क्लिष्ट अटीमुळे ‘तो’ उपायही जीवघेणा

By admin | Updated: December 26, 2015 02:19 IST

जंगली श्वापदांचा उच्छांद कमी करण्यासाठी शासनाने काही अटींवर अश्या श्वापदांना मारण्याची परवानगी दिली आहे.

मदतही तुटपुंजी : शेतकरी वर्गापुढे प्रश्नचआकोली : जंगली श्वापदांचा उच्छांद कमी करण्यासाठी शासनाने काही अटींवर अश्या श्वापदांना मारण्याची परवानगी दिली आहे. पण या श्वापदांना मारण्याची अट क्लिष्ट असल्यामुळे हा उपायही शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसणारा असल्याची ओरड शेतकरी करीत आहे.आकोली परिसर हा जंगलव्याप्त आहे. मदन, पंचधारा, वडगाव, बोरखेडी व मदना ही धरणे याच परिसरात आहे. त्यामुळे हरीण, रोही, निलगाव, डुक्कर अदी वन्य प्राण्यांना वावर या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. प्राण्याचे कळपच्या कळप जंगलात फिरत असतात. त्यात वाघाचाही संचार असल्यामुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेताकडे वळविला आहे. परिणामी उभी पिके नष्ट होत आहे. कपाशी, तूर, गहू, चना, ऊस या पिकांचा फडशा पाडला जात आहे. वर्षानुवर्शे शेतकरी जंगली श्वापदांचा उपद्रव सहन करीत असल्याने अश्या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकरी करीत होते. यावर निर्णय घेत शासनाने अश्या प्राण्यांना जीवे मारण्याची परवानगी दिली. पण यासाठी ठरवून दिलेली पद्धत मात्र शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याचे शेतकरी सांगत आहे. यामध्ये परावानगी दिल्यानंतर ४८ तासात श्वापदाला बंदुकीने मारणे, श्वापद मारल्यानंतर वनरक्षकाला कळविणे, मृत श्वापदाला पुरविण्याकरिता खड्डा शेतकऱ्यानेच खोदावा अशा अटी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हा उपाय करण्यास धजावत नाही. परिणामी अद्याप एकही परवानगी अर्ज विभागात दाखल नाही. अजूनही अनेक शेतकरी पिकासभोवती तार बांधुन त्यात वीजप्रवाह सोडून शेतीचे संरक्षण करतात. पण हा बेकायदेशीर उपाय जनावरांसह माणसांच्याही जीवावर बेतत आहे. तसेच वनविभागाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. ‘मदत नको पण श्वापद आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कागदपत्र, फोटो देवून मिळणारी मदत हसावे की रडावे अशी असते. वनविभागाने श्वापदांना मारण्याची पद्धत सोपी करावी. मदतीचे निकष सुद्धा बदलवून मदतीत वाढ करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वनविभागाकडे करीत आहे.(वार्ताहर)