शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

घोराड येथील युवा शेतकरी विठ्ठल बापूराव वानोडे यांच्या शेतात असलेले पॉलिहाऊस या वादळाने उडाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यामध्ये असणारी फुल झाडे यांचे नुकसान होत आहे. आधीच कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देचौथ्यांदा तडाखा : केळी बागांसह पॉलिहाऊसचे नुकसान, घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात रब्बी हंगामात तीन ते चारवेळा वादळवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मार्च, एप्रिल आणि मे च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. यात केळीबागांसह पॉलिहाऊस आणि ग्रामीण भागात घरांची पडझड होत छत, टिनपत्रे उडून आर्थिक नुकसान झाले. अनेक डेरेदार वृक्ष उन्मळून पडले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप कापूस खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरातच कापूस लॉकडाऊन आहे. पर्यायाने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना हे पांढरे सोने मातीमोल भावात विकत आहेत. दुसरीकडे सीसीआयकडूनही कापसाला हमीभाव देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. रब्बी हंगामातील उत्पन्नावरच शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करतात. मात्र, अवकाळीने सातत्याने फटका दिल्याने अनेकांचे खरिपाचे नियोजन कोलमडल्याची स्थिती आहे.हिंगणीत गारपिटीने लाखोंचे नुकसानहिंगणी : गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वारा आणि पाणी व गारांचा अर्धा तास सारखा पाऊस पडला. यात केळीबागा, भाजीपाला, टमाटर, वांगी, मिरची पालक, कोथिंबीर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी संजय बाबुलाल डेकाटे यांच्या शेतामध्ये दोन एकर केळीचा बगीचा आहे. गुरुवारच्या गारपिटीने केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. यात त्यांचे लाखावर नुकसान झाले. वादळामुळे रवी डेकाटे यांच्या पिकांचेही नुकसान झाले. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी डेकाटे बंधूंनी केली आहे.पॉलिहाऊस उडाल्याने तीन लाखांचे नुकसानघोराड येथील युवा शेतकरी विठ्ठल बापूराव वानोडे यांच्या शेतात असलेले पॉलिहाऊस या वादळाने उडाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यामध्ये असणारी फुल झाडे यांचे नुकसान होत आहे. आधीच कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.केळीच्या बागा नावापुरत्या राहिल्या असल्या तरी महागड्या खर्चाच्या असलेल्या या बागांपासून अवघ्या दोन महिन्यांनी हातात उत्पन्न येण्याची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यात घनश्याम माहुरे, गजानन वरटकर, दीपक झोरे, नितीन माहुरे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.तिसºयांदा सेलू परिसराला वादळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.अन् अनर्थ टळलागावाच्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतून मध्यरात्री आलेल्या वादळादरम्यान शॉर्ट सर्किट होत असल्याचे नागरिकांना दिसले. दरम्यान त्यांनी शाळेकडे धाव घेतली असता तेथे रद्दी पेटत असल्याचे दिसून आले. शाळेच्या टाक्यातील पाणी टाकून ती विझविण्यात आली. मात्र, ही रद्दी कुणी व केव्हा पेटविली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे वीज वितरणचे नुकसान होत आहे. वादळीवाऱ्यामुळे शेतशिवारातील वाकलेले वीजखांब व तुटलेल्या तारा त्वरित जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. शेतकरी शेतात शिल्लक असलेल्या पिकाची काळजी घेऊन काही उत्पन्न पदरी पाडू शकतो.- दीपक झोरे, केळी उत्पादक, घोराड

टॅग्स :Rainपाऊस