शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लालपरी थांबल्याने फेरीवाले, रिक्षेवाल्यांची रोजीरोटी बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जवळपास महिन्याभरापासून संप सुरू आहे. आता हा संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच बसस्थानक परिसर, स्थानकासमोर व्यवसाय करणारे फेरीवाले, पुस्तक, फळे विक्रेते यासोबतच रिक्षाचालक आदींचा व्यवसाय बुडाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रवाशांसह बसस्थानकातील प्रवाशांवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांचा पोटमारा होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहे. पण, बसअभावी फरफट होत आहे. 

मुलांची दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यावर असल्याने हे अभ्यासाचे दिवस आहे. सध्या सर्व शाळेत परीक्षा सुरू आहे. परंतु एसटी बंद असल्याने मला दररोज मुलीला दुचाकीने शाळेत सोडावे-आणावे लागते. त्यामुळे माझीही कामाचे नियोजन बिघडले आहे.- मोहन कांबळे, पालक, माठोडा बेनोडा.

मी दररोज एसटीमध्ये चढून बिस्किटे, गोळ्या, खारे दाणे विकायचो. त्यातून मिळणाऱ्या पैशावर आमचा उदरनिर्वाह चालत होता. आता एसटीचा संप सुरू असल्याने बसेस बंद आहे. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - बालपांडे, नेत्रहिन फेरीवाला.

बसस्थानकाबाहेर आमचा रिक्षा उभा असतो. बसमधून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचून दिल्यानंतर आम्हाचा पैसे मिळतात. पण, आता बसेस बंद असल्याने प्रवाशी फिरकतच नाही. त्यामुळे दिवसभर बसून राहावे लागते. आधीच कोरोनाकाळात होतं नव्हतं सारच गेलं. - देवराव, रिक्षाचालक.

आमच्या परीक्षा सुरू आहे. बसेस सुरू नाही खासगी वाहनाने यावे लागते. ते तीन पट प्रवासभाडे घेतात. आमची विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.- कृतिका सुरेश खरे, विद्यार्थिनी.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप