शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लालपरी थांबल्याने फेरीवाले, रिक्षेवाल्यांची रोजीरोटी बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जवळपास महिन्याभरापासून संप सुरू आहे. आता हा संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच बसस्थानक परिसर, स्थानकासमोर व्यवसाय करणारे फेरीवाले, पुस्तक, फळे विक्रेते यासोबतच रिक्षाचालक आदींचा व्यवसाय बुडाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रवाशांसह बसस्थानकातील प्रवाशांवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांचा पोटमारा होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहे. पण, बसअभावी फरफट होत आहे. 

मुलांची दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यावर असल्याने हे अभ्यासाचे दिवस आहे. सध्या सर्व शाळेत परीक्षा सुरू आहे. परंतु एसटी बंद असल्याने मला दररोज मुलीला दुचाकीने शाळेत सोडावे-आणावे लागते. त्यामुळे माझीही कामाचे नियोजन बिघडले आहे.- मोहन कांबळे, पालक, माठोडा बेनोडा.

मी दररोज एसटीमध्ये चढून बिस्किटे, गोळ्या, खारे दाणे विकायचो. त्यातून मिळणाऱ्या पैशावर आमचा उदरनिर्वाह चालत होता. आता एसटीचा संप सुरू असल्याने बसेस बंद आहे. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - बालपांडे, नेत्रहिन फेरीवाला.

बसस्थानकाबाहेर आमचा रिक्षा उभा असतो. बसमधून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचून दिल्यानंतर आम्हाचा पैसे मिळतात. पण, आता बसेस बंद असल्याने प्रवाशी फिरकतच नाही. त्यामुळे दिवसभर बसून राहावे लागते. आधीच कोरोनाकाळात होतं नव्हतं सारच गेलं. - देवराव, रिक्षाचालक.

आमच्या परीक्षा सुरू आहे. बसेस सुरू नाही खासगी वाहनाने यावे लागते. ते तीन पट प्रवासभाडे घेतात. आमची विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.- कृतिका सुरेश खरे, विद्यार्थिनी.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप