शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

वन्य प्राण्यांकडून ऊस पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:44 IST

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे२५ हजारांचे नुकसान : शासकीय मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.मौजा डोरली शिवारात अशोक नरबरिया याचे शेत आहे. त्यांनी पावणे दोन एकरात ऊसाची लागवड केली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, सदर शेतात रानडुक्करांच्या कळपाने रात्रीच्या सुमारास घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. सुमारे एक एकरातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुक्करांनी केले असल्याचे शेतकरी सांगतो. उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी अशोक नरबरिया यांचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. ते उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागतो. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे योग्य कार्यवाहीची गरज आहे.उभ्या पिकाचे नुकसानतळेगाव(श्या.पं.) - काही शेतकऱ्यांच्या शेतात नुकत्याच पेरण्या आटोपल्या. त्यापैकी बऱ्याच शेतात पीकही अंकुरले आहे; पण वन्य प्राणी अंकुरलेल्या पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या चांगलीच माथापच्छी करावी लागत आहे. पिकांवर रोही, बंदर आदी वन्य प्राणी ताव मारत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ