शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे बजेट गडगडले

By admin | Updated: April 16, 2016 01:33 IST

उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटत असल्याने होणारी दरवाढ ही बाब नेहमीचीच झाली आहे.

सर्वसामान्यांना महागाईचे चटके : आंब्याचे भावही भिडले गगनालावर्धा : उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटत असल्याने होणारी दरवाढ ही बाब नेहमीचीच झाली आहे. गतकाही वर्षांपासून भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढल्याने उन्हाळ्यात मंदावणारी आवक आता वाढली असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. असे असले तरी टमाटर आणि कांदे वगळता अन्य भाज्यांचे दर किलो मागे सर्वसाधारण १० रुपयांनी वधारल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला भाजी घेताना चांगलीच कात्री लागेल, असे चित्र आहे.यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याची चव चाखणेही महागातच पडेल, असे दिसून येत आहे. आंब्याची आवक सुरू झाली आहे. प्रारंभी आंब्याचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलो आहेत. शिवाय पन्हे, सरबत आणि लोणच्यासाठी असलेल्या कच्चे आंबे ८० रुपये प्रतिकिलो आहे. भेंडी, चवळी, गवार यांचे दर वधारलेलेच दिसून येतात. यामुळे बाजारात गेल्यानंतर कोणती भाजी विकत घ्यावी, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडत असल्याचे दिसते. वांगे, पालक या भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.जिल्ह्यात शेडनेट, मल्चिंग शेतीच्या माध्यमातून फळ, भाज्या व पालेभाज्यांची पिके घेतली जातात. या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने अन्य जिल्ह्यातून भाजीपाल्याची होणारी आयातही कमी झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडून मुबलक साठा उपलब्ध होत असल्याचे घाऊक व्यापाऱ्याने सांगितले; पण मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळाने भाजीपाला पिकांना चांगलाच फटका बसला. परिणामी, दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडत असल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)फळांचे भावही वधारलेउन्हाळ्यात रसाळ फळांची विशेष मागणी असते. यात द्राक्ष, तरबुज, डांगर, डाळींब यांची अधिक विक्री होते. दरवर्षी द्राक्षाचे भाव ४० ते ८० रुपयांपर्यंत असतात; पण यंदा या भावात वाढ झाल्याचे दिसते. बाजारात ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे द्राक्ष आहेत. द्राक्षात तीन प्रकार असून कॅप्सूल आणि काळ्या द्राक्षांचे भाव अधिकच आहेत. शिवाय आंब्याचे दर प्रारंभीपासूनच अधिक असल्याने यंदा आंबा आणखी महागणार, असे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मर्यादित आहे. मे महिन्यापर्यंत आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली. बैगणपल्ली, बदाम या आंब्यांचे भाव सध्या १०० ते १५० रुपये किलो आहेत.