शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शेतकरी आत्महत्येची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळा

By admin | Updated: September 23, 2015 05:44 IST

घरच्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब व शेतीची जबाबदारी स्वीकारत असताना गतवर्षी सोयाबीनची

वर्धा : घरच्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब व शेतीची जबाबदारी स्वीकारत असताना गतवर्षी सोयाबीनची नापिकी व बँकेचे कर्ज फेडू शकत नसल्याच्या विवंचनेत वायगाव (नि.) येथील महिला शेतकरी साधना ज्ञानेश्वर सुपारे (५३) यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने अत्यंत संवेदनशील राहून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.वायगाव (नि.) येथील महिला शेतकऱ्यांच्या निवासस्थानी भेट देत मुलगा संदीप सुपारे (३५) व सून शीतल सुपारे यांचे सांत्वन केले. आर्थिक अडचणीत असलेल्या या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, सरपंच गणेश वांदाडे, तहसीलदार राहुल सारंग, रमेश वाळके, हेलोडे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.साधना सुपारे या शेतकरी महिलेने रविवारी जाळून घेत आत्महत्या केली. शेतीमुळे विवंचनेत सापडलेल्या कुटुंबियांची तिवारी यांनी आस्थेने चौकशी केली. चार एकर शेतातील कापूस व सोयाबीन पिकाला आलेला खर्च, स्टेट बँकेचे असलेले कर्ज, गतवर्षी सोयाबीन पिकाची झालेली नापिकी यामुळे कर्ज फेडण्यात विवंचना आदीची माहिती कुटुंबियांनी दिली. शेतीतील विविध अडचणी योजनांचा लाभ मिळण्यासाठी होणारा विलंब सोबतच सततची नापिकी, उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही. सोबत कुटुंबातील आरोग्याचा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याचे कार्य करावे. अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावेत, अशी सूचना तिवारी यांनी केल्या.(कार्यालय प्रतिनिधी)