शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शेतकरी आत्महत्येची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळा

By admin | Updated: September 23, 2015 05:44 IST

घरच्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब व शेतीची जबाबदारी स्वीकारत असताना गतवर्षी सोयाबीनची

वर्धा : घरच्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब व शेतीची जबाबदारी स्वीकारत असताना गतवर्षी सोयाबीनची नापिकी व बँकेचे कर्ज फेडू शकत नसल्याच्या विवंचनेत वायगाव (नि.) येथील महिला शेतकरी साधना ज्ञानेश्वर सुपारे (५३) यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने अत्यंत संवेदनशील राहून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.वायगाव (नि.) येथील महिला शेतकऱ्यांच्या निवासस्थानी भेट देत मुलगा संदीप सुपारे (३५) व सून शीतल सुपारे यांचे सांत्वन केले. आर्थिक अडचणीत असलेल्या या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, सरपंच गणेश वांदाडे, तहसीलदार राहुल सारंग, रमेश वाळके, हेलोडे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.साधना सुपारे या शेतकरी महिलेने रविवारी जाळून घेत आत्महत्या केली. शेतीमुळे विवंचनेत सापडलेल्या कुटुंबियांची तिवारी यांनी आस्थेने चौकशी केली. चार एकर शेतातील कापूस व सोयाबीन पिकाला आलेला खर्च, स्टेट बँकेचे असलेले कर्ज, गतवर्षी सोयाबीन पिकाची झालेली नापिकी यामुळे कर्ज फेडण्यात विवंचना आदीची माहिती कुटुंबियांनी दिली. शेतीतील विविध अडचणी योजनांचा लाभ मिळण्यासाठी होणारा विलंब सोबतच सततची नापिकी, उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही. सोबत कुटुंबातील आरोग्याचा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याचे कार्य करावे. अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावेत, अशी सूचना तिवारी यांनी केल्या.(कार्यालय प्रतिनिधी)