शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

हागणदारीमुक्त ग्रामयोजनेचा फज्जा

By admin | Updated: September 21, 2015 02:00 IST

शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या संताच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवित येत आहे.

जनजागृतीचा अभाव : शौचालय असताना वापर होतो नाममात्रतळेगाव (श्या.पं.) : शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या संताच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवित येत आहे. या अभियातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येते. मात्र तळेगावात या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळते. ग्रामस्थांकडे शौचालय असले तरी त्याचा वापर नाममात्र होत असल्याने स्वच्छताविषयक जागृतीचा अभाव दिसून येतो.गावातील रिकाम्या भूखंडाचा वापर शौचविधी उरकण्याकरिता होत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शासन ग्रामीण भागातील नागरिकांत स्वच्छताविषयक जागृती निर्माण करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. गाव हागणदारीमुक्त करण्याकरिता शौचालय बांधकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतून येथेही घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र त्याचा वापर माफक होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातून हागणदारीमुक्तीसाठी शासन विविध पुरस्कार देते. मात्र पुरस्कार प्राप्त गावांची अवस्था दयनीय असल्याचे चित्र आहे. शौचास बाहेर जाणाऱ्यांना चाप लावण्यासाठी गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले. मात्र कारवाईचा अभाव असल्याने हे पथक नाममात्र ठरत आहे. आष्टी तालुक्यातील ४१ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावात रस्त्यावर शौचाला बसण्याचा प्रकार पहायला मिळतो. जिल्ह्यात मागील पाच वर्षात स्वच्छता अभियान आष्टी तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात राबविण्यात आले. तरीही ग्रामस्थांत जागृतीचा अभाव दिसून येत असल्याने योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.(वार्ताहर) नवनियुक्त बीडीओंकडून ग्रामस्थांना अपेक्षा पंचायत समितीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेले नव्या उमेदीचे गटविकास अधिकारी श्रेणी एकमधील एम.एस. चव्हाण हे रूजू झाले आहेत. या तालुक्यात पुन्हा हागणदारीमुक्त गाव अभियानाला सुरुवात करावी. जे ग्रामस्थ रस्त्यावर शौचास बसतात, त्यांच्याकडे शौचालय आहेत काय, जर असतील तर उपयोग का करीत नाही, शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन रस्त्यावर शौचाला बसत असेल तर त्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नवनियुक्त बीडीओ चव्हाण यांच्याकडून अनेक सुज्ञ ग्रामस्थांनी व्यक्त केली.पंचायत समिती प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारण्याऐवजी ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. योजनेतून शौचालय बांधणी होत नसेल तर शासनाने भरीव निधी शौचालय बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. ग्रामस्थांनीही घरी शौचालय बांधून प्रशासनाला सहकार्य करावे. - माधुरी गो. बुले, सदस्य, पं.स. आष्टी (श.).पुरस्कारांची रक्कम जाते कुठे ?पुरस्कार मिळाल्यानंतर त्या बक्षिसाची रक्कम ही त्या गावाने आपल्या स्वच्छतेच्या सोयी-सुविधा टिकविण्यासाठी, त्यात सुधारणा करण्यासाठी त्याचा विनियोग करावा, अशी शासनाची अपेक्षा आहे; पण हा पैसा जातो कुठे, हा संशोधनाच्या विषय आहे. थेट राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणाऱ्या लोकप्रतिनिधींनी योजनेचा दर्जा उत्तम राहावा यासाठी जनजागृती करावी, दुर्लक्ष केलेल्या ग्रामस्थांना प्रबोधन करावे, तेव्हाच हेतू साध्य होऊ शकेल.