शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:10 IST

येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला.

ठळक मुद्देदेशमुखांकडून दलित वस्तीला पाणीपुरवठा। ग्रा. पं. ची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेड : येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला. तात्पुरता का होईना गरज भागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.तीर्थक्षेत्र असलेल्या टाकरखेड या गावात कधी नव्हे, एवढी भीषण पाणीसमस्या निर्माण झाली. याला संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कारभारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गत पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष केल्याने विहिरीत गाळ साचून झरे बुजले आणि पाणीपातळी खालावली. तसेच गडी वॉर्ड व दलित वस्ती ही उंच भागात येत असल्याने येथे नळाद्वारे पाणीपुुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दुसरी टाकी उभारून अर्धे-अर्धे गाव याला जोडण्यात आले.ग्रामपंचायत प्रशासनाची नियोजनशून्यता आणि कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. या भागातील टाकी कधीच पूर्ण भरली जात नाही. त्यामुळे या भागाला अल्प प्रमाणात पाणी आणि तेही काही भागात नळाद्वारे पोहोचत नसल्याने सर्वत्र मोटारपंप बसविण्यात आले. ज्यांच्याकडे मोटारपंप नाही, त्यांच्या नळाला पाणीच येईनासे झाल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे. या महिन्यात पाणीसमस्या आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. यातूनच जनक्षोभ वाढू शकतो. टाकरखेड्यात जनआंदोलन उभे होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नागरिकांनी व्यक्त केले समाधानगेल्या पाच दिवसांपासून या भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत होती. महिलांना होणारा त्रास पाहून लहानूजी महाराज संस्थानचे उपाध्यक्ष डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीतून पाईप लाईन टाकून दलित वस्तीला पाणीपुरवठा केला. त्यामुळे तात्पुरती का होईना पाण्याची गरज भागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पण अशीच अपेक्षा आता नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई