शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:10 IST

येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला.

ठळक मुद्देदेशमुखांकडून दलित वस्तीला पाणीपुरवठा। ग्रा. पं. ची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेड : येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला. तात्पुरता का होईना गरज भागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.तीर्थक्षेत्र असलेल्या टाकरखेड या गावात कधी नव्हे, एवढी भीषण पाणीसमस्या निर्माण झाली. याला संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कारभारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गत पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष केल्याने विहिरीत गाळ साचून झरे बुजले आणि पाणीपातळी खालावली. तसेच गडी वॉर्ड व दलित वस्ती ही उंच भागात येत असल्याने येथे नळाद्वारे पाणीपुुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दुसरी टाकी उभारून अर्धे-अर्धे गाव याला जोडण्यात आले.ग्रामपंचायत प्रशासनाची नियोजनशून्यता आणि कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. या भागातील टाकी कधीच पूर्ण भरली जात नाही. त्यामुळे या भागाला अल्प प्रमाणात पाणी आणि तेही काही भागात नळाद्वारे पोहोचत नसल्याने सर्वत्र मोटारपंप बसविण्यात आले. ज्यांच्याकडे मोटारपंप नाही, त्यांच्या नळाला पाणीच येईनासे झाल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.संपूर्ण मे महिना शिल्लक आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे. या महिन्यात पाणीसमस्या आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. यातूनच जनक्षोभ वाढू शकतो. टाकरखेड्यात जनआंदोलन उभे होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नागरिकांनी व्यक्त केले समाधानगेल्या पाच दिवसांपासून या भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत होती. महिलांना होणारा त्रास पाहून लहानूजी महाराज संस्थानचे उपाध्यक्ष डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीतून पाईप लाईन टाकून दलित वस्तीला पाणीपुरवठा केला. त्यामुळे तात्पुरती का होईना पाण्याची गरज भागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पण अशीच अपेक्षा आता नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई