शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

चलन तुटवड्याने कापूस खरेदी अर्ध्यावर

By admin | Updated: January 1, 2017 02:06 IST

कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून आर्वी हे इतर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण यावर्षी या बाजारपेठेलाही

शेतकरी व व्यापारीही त्रस्त : डिसेंबर अखेर १.९८ लाख क्विंटल कापसाची आवक आर्वी : कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून आर्वी हे इतर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण यावर्षी या बाजारपेठेलाही चलन तुटवड्याचा चांगलाच फटका बसला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात २ लाख क्विंटलच्या वर पोहोचणारी कापूस खरेदी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९८ हजार ३५७.७९ क्विंटल एवढ्या अत्यल्प कापसाची आवक झाली. रोख चुकाऱ्याअभावी ही आवक मंदावली आहे. आर्वीची कृषी उत्पन्न बाजार समिती व येथील कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. ८ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने लागू केलेल्या नोटाबंदीचा फटका सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व बॅँकांत माल विकून मिळणारा अपूऱ्या पैशातून शेतातील कामावर असलेल्या मजुरांची मजुरी द्यावी कशी, घरखर्च कोणत्या पैशातून चालवावा या नवीन संकटाने तालुक्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. एक महिन्यानंतरही बँकांतील चलन तुटवडा कमी झाला नाही. यामुळे आपल्याच हक्काच्या मालाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना बॅँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. सध्या रबी हंगामातील रोख रक्कम मिळवून देणारे कपाशीचे पीक शेतकरी आर्वीत विकण्यासाठी आणत आहे. ५००० ते ५०५० पर्यंत कापसाचा भाव आहे. खासगी व्यापारी या चलन तुटवड्याने त्रस्त असल्याने शेतकऱ्यांनी विकायला आणलेल्या मालाचा थेट धनादेश दिला जात आहे. यात शेतकऱ्यांना रोख रक्कम चुकाऱ्यासाठी पाहिजे असते; पण माल विकलेला धनादेश शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. बॅँकेत जमा झालेल्या धनादेशातून केवळ चार हजार शेतकऱ्याला बॅँकेतून दिले जातात. या रकमेतून तो कामावरच्या मजुराचा चुकारा वा इतर घर खर्च कसा करणार, हा प्रश्नच आहे. या चलन तुटवड्याचा सर्वाधिक फटका कापूस व्यापारी व उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे दरवर्षी डिसेंबर महिन्यात दोन लाखांच्या वर होणारी कापसाची आवक यंदा चलन तुटवड्याने अर्ध्यावर आली. डिसेंबर २०१५ मध्ये आर्वी बाजारात कापसाची २ लाख ४१ हजार ७४० क्विंटल आवक होती. यावर्षी ती केवळ १ लाख ९८ हजार ३५७ हजार क्विंटलच झाली आहे. आर्वीत एकूण १५ जीन सुरू असून यात कापसाचे २७ खासगी व्यापारी, रोहणा दोन, खरांगणा तीन असे ३२ खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे; पण चलन तुटवड्यामुळे कापसाची आवकच घटल्याने व्यापाऱ्यांचीही गोची झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)