शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

चलन तुटवड्याने कापूस खरेदी अर्ध्यावर

By admin | Updated: January 1, 2017 02:06 IST

कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून आर्वी हे इतर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण यावर्षी या बाजारपेठेलाही

शेतकरी व व्यापारीही त्रस्त : डिसेंबर अखेर १.९८ लाख क्विंटल कापसाची आवक आर्वी : कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून आर्वी हे इतर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण यावर्षी या बाजारपेठेलाही चलन तुटवड्याचा चांगलाच फटका बसला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात २ लाख क्विंटलच्या वर पोहोचणारी कापूस खरेदी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९८ हजार ३५७.७९ क्विंटल एवढ्या अत्यल्प कापसाची आवक झाली. रोख चुकाऱ्याअभावी ही आवक मंदावली आहे. आर्वीची कृषी उत्पन्न बाजार समिती व येथील कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. ८ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने लागू केलेल्या नोटाबंदीचा फटका सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व बॅँकांत माल विकून मिळणारा अपूऱ्या पैशातून शेतातील कामावर असलेल्या मजुरांची मजुरी द्यावी कशी, घरखर्च कोणत्या पैशातून चालवावा या नवीन संकटाने तालुक्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. एक महिन्यानंतरही बँकांतील चलन तुटवडा कमी झाला नाही. यामुळे आपल्याच हक्काच्या मालाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना बॅँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. सध्या रबी हंगामातील रोख रक्कम मिळवून देणारे कपाशीचे पीक शेतकरी आर्वीत विकण्यासाठी आणत आहे. ५००० ते ५०५० पर्यंत कापसाचा भाव आहे. खासगी व्यापारी या चलन तुटवड्याने त्रस्त असल्याने शेतकऱ्यांनी विकायला आणलेल्या मालाचा थेट धनादेश दिला जात आहे. यात शेतकऱ्यांना रोख रक्कम चुकाऱ्यासाठी पाहिजे असते; पण माल विकलेला धनादेश शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. बॅँकेत जमा झालेल्या धनादेशातून केवळ चार हजार शेतकऱ्याला बॅँकेतून दिले जातात. या रकमेतून तो कामावरच्या मजुराचा चुकारा वा इतर घर खर्च कसा करणार, हा प्रश्नच आहे. या चलन तुटवड्याचा सर्वाधिक फटका कापूस व्यापारी व उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे दरवर्षी डिसेंबर महिन्यात दोन लाखांच्या वर होणारी कापसाची आवक यंदा चलन तुटवड्याने अर्ध्यावर आली. डिसेंबर २०१५ मध्ये आर्वी बाजारात कापसाची २ लाख ४१ हजार ७४० क्विंटल आवक होती. यावर्षी ती केवळ १ लाख ९८ हजार ३५७ हजार क्विंटलच झाली आहे. आर्वीत एकूण १५ जीन सुरू असून यात कापसाचे २७ खासगी व्यापारी, रोहणा दोन, खरांगणा तीन असे ३२ खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे; पण चलन तुटवड्यामुळे कापसाची आवकच घटल्याने व्यापाऱ्यांचीही गोची झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)