शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पालकमंत्र्यांनी जाणले ‘लोकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:17 IST

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या.

ठळक मुद्देजनसंवाद सभा : नागरिकांनी २७५ तक्रारीतून मांडल्या समस्या, पंधरा दिवसांत निपटारा करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या. बहुतांश प्रकरणाचा जागेवर निकाल लाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. पालकमंत्र्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सभागृहातील विभाग प्रमुख आणि कर्मचारी घामाघूम झाले होते.स्थानिक विकास भवनात पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत दुपारी १ वाजता जनसंवाद सभेला सुरुवात झाली. ही सभा सायंकाळी ५ वाजतापर्यंत चालली. कर्जमाफी झाली नाही, कृषी पंप वीज जोडणी मिळाली नाही, फेरफारसाठी ६ महिन्यांपूर्वी अर्ज देऊनही फेरफार झाले नाही, वर्ग २ च्या जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर झाले नाही, दारूबंदी, बोगस बियाणे, नादुरुस्त व दर्जाहीन रस्ते, बांधकाम, तसेच कामगारांची बोगस नोंदणी अशा अनेक तक्रारींचा नागरिकांनी पाढाच वाचला. ना. बावनकुळे यांनी स्वत: प्रत्येक अर्ज स्वीकारुन अर्जदाराचे समाधान केले. आलेल्या प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकऱ्यांनी १५ दिवसाच्या आत कार्यवाही करून तक्रारदाराला लेखी कळवावे. एखाद्या नागरिकांचे काम नियमात बसत नसेल तर तसे सुद्धा त्याला लेखी कळवून अर्ज निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि विकास योजनांची माहिती देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी गावात शिबिर आयोजित करावे. अधिकाºयायांनी क्षेत्रभेटी द्याव्यात आणि तिथेच लोकांच्या तक्रारी सोडवाव्यात. एकाच प्रकारच्या तक्रारी पुन्हा येऊ नयेत याची अधिकाºयांनी काळजी घ्यावी. वीज वितरण विभागाच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे यापुढे वीज वितरण विभागाच्या तक्रारी येऊ नये याबाबत अधिकाºयांनी सजग रहावे, असेही सांगितले. अन्नधान्य, गॅस, आवास, वीज, ग्रामीण व नझुल क्षेत्रातील पट्टे वाटप हे प्रश्न तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने मार्गी लावावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ आणि २ आॅगस्टला वर्धेत आहेत. त्यावेळी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती,कृत्रिम पावसाचे नियोजन, विकास कामे, अडलेले प्रकल्प आदींची माहिती देण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाºयांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेत. या जनसंवाद सभेला आमदार डॉ. पंकज भोयर, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपवन संरक्षक सुनील शर्मा, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.सेवाग्राम आश्रमात केली ना.बावनकुळे यांनी प्रार्थनावर्ध्यातील जनसंवाद आटोपल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी आश्रमचे मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतगुंड, खादीची शाल व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रार्थना भूमीवरील सर्वधर्म प्रार्थनेत सहभागी होऊन त्यांनी प्रार्थना केली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, माजी खा.सुरेश वाघमारे, आश्रमचे जालंधरनाथ, सिद्धेश्वर उंबरकर, विजय धुमाळे, सचित्रा झाडे, प्रभा शहाने, रुपाली उगले यांची उपस्थिती होती. या दरम्यान ना. बावनकुळे यांनी सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत बैठकही घेतली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेSewagramसेवाग्राम