शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना हमीभावाचाच आधार

By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST

दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे.

बाजारात सोयाबीनची आवक वाढली : व्यापाऱ्यांकडून दर पाडण्याची शक्यता; बळीराजा चिंतेतवर्धा : दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. आवक वाढताच आता भाव गडगडण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना वाढीव दरापेक्षा शासनाने जाहीर केलेल्या हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र बाजारात आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले त्या काळात ३ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आला होता. हा दर कायम राहील असे वाटत असताना त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथील बाजारात सोयाबीनला २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. वर्धेतही शेतकऱ्यांना तोच दर दिल्या जात आहे. प्रारंभी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न बाजारात आणणे सुरू केले. बाजारील दरामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पडलेल्या दरामुळे त्यांना त्यांची इच्छा जागीच विसरावी लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांचा शेतमाल येताच दर पडण्याचा अलिखित नियम कायम असल्याचे दिसून आले. बाजारात सोयाबीन आणताच व्यापाऱ्यांकडून तो ओला आहे, त्यात कचरा आहे, असे म्हणत अत्यल्प दरात त्याची बोली लावण्यात येत आहे. यामुळे त्याला दर मिळेल अथवा नाही, अशी त्यांची मनस्थिती येथे होत असल्याचे दिसते. यातच काही व्यापारी नगदी चुकाऱ्याची लालूस देत हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांची लूट होवू नये म्हणून हमीभाव जाहीर केला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी निदान त्याची लूट होण्याच्या प्रकारामुळे याला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सध्या तरी हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याची स्थिती आहे. उजेडाच्या सणाकरिता घरातील सोयाबीन विकूण मुला- बाळांची दिवाळी साजरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आलेल्या चुकाऱ्यात काय करावे असा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे त्याची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.(प्रतिनिधी)