शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हमीभावाचाच आधार

By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST

दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे.

बाजारात सोयाबीनची आवक वाढली : व्यापाऱ्यांकडून दर पाडण्याची शक्यता; बळीराजा चिंतेतवर्धा : दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. आवक वाढताच आता भाव गडगडण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना वाढीव दरापेक्षा शासनाने जाहीर केलेल्या हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र बाजारात आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले त्या काळात ३ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आला होता. हा दर कायम राहील असे वाटत असताना त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथील बाजारात सोयाबीनला २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. वर्धेतही शेतकऱ्यांना तोच दर दिल्या जात आहे. प्रारंभी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न बाजारात आणणे सुरू केले. बाजारील दरामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पडलेल्या दरामुळे त्यांना त्यांची इच्छा जागीच विसरावी लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांचा शेतमाल येताच दर पडण्याचा अलिखित नियम कायम असल्याचे दिसून आले. बाजारात सोयाबीन आणताच व्यापाऱ्यांकडून तो ओला आहे, त्यात कचरा आहे, असे म्हणत अत्यल्प दरात त्याची बोली लावण्यात येत आहे. यामुळे त्याला दर मिळेल अथवा नाही, अशी त्यांची मनस्थिती येथे होत असल्याचे दिसते. यातच काही व्यापारी नगदी चुकाऱ्याची लालूस देत हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांची लूट होवू नये म्हणून हमीभाव जाहीर केला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी निदान त्याची लूट होण्याच्या प्रकारामुळे याला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सध्या तरी हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याची स्थिती आहे. उजेडाच्या सणाकरिता घरातील सोयाबीन विकूण मुला- बाळांची दिवाळी साजरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आलेल्या चुकाऱ्यात काय करावे असा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे त्याची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.(प्रतिनिधी)