शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

शेतकऱ्यांना हमीभावाचाच आधार

By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST

दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे.

बाजारात सोयाबीनची आवक वाढली : व्यापाऱ्यांकडून दर पाडण्याची शक्यता; बळीराजा चिंतेतवर्धा : दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. आवक वाढताच आता भाव गडगडण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना वाढीव दरापेक्षा शासनाने जाहीर केलेल्या हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र बाजारात आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले त्या काळात ३ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आला होता. हा दर कायम राहील असे वाटत असताना त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथील बाजारात सोयाबीनला २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. वर्धेतही शेतकऱ्यांना तोच दर दिल्या जात आहे. प्रारंभी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न बाजारात आणणे सुरू केले. बाजारील दरामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पडलेल्या दरामुळे त्यांना त्यांची इच्छा जागीच विसरावी लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांचा शेतमाल येताच दर पडण्याचा अलिखित नियम कायम असल्याचे दिसून आले. बाजारात सोयाबीन आणताच व्यापाऱ्यांकडून तो ओला आहे, त्यात कचरा आहे, असे म्हणत अत्यल्प दरात त्याची बोली लावण्यात येत आहे. यामुळे त्याला दर मिळेल अथवा नाही, अशी त्यांची मनस्थिती येथे होत असल्याचे दिसते. यातच काही व्यापारी नगदी चुकाऱ्याची लालूस देत हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांची लूट होवू नये म्हणून हमीभाव जाहीर केला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी निदान त्याची लूट होण्याच्या प्रकारामुळे याला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सध्या तरी हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याची स्थिती आहे. उजेडाच्या सणाकरिता घरातील सोयाबीन विकूण मुला- बाळांची दिवाळी साजरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आलेल्या चुकाऱ्यात काय करावे असा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे त्याची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.(प्रतिनिधी)