शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांनी भुईमूग केले भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:26 IST

शेतमालाकरिता वन्यप्राणी कर्दनकाळच ठरत असल्याचे चिकणी व परिसरातील शेतशिवारात दिसून येते. शेतातील कोणतेही पीक वन्यप्राणी पिकांना फस्त केल्याशिवाय राहात नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी चिकणी व परिसरातील शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देकुटारच उरले : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शेतमालाकरिता वन्यप्राणी कर्दनकाळच ठरत असल्याचे चिकणी व परिसरातील शेतशिवारात दिसून येते. शेतातील कोणतेही पीक वन्यप्राणी पिकांना फस्त केल्याशिवाय राहात नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी चिकणी व परिसरातील शेतकरी करीत आहेत.येथील श्ेतकरी किसना डायरे यांचे निमगाव (सबाने) पांदण रस्त्यालगत चिकणी शिवारात पावणे चार एकर ओलिताखालील शेती आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी एक एकर शेतात ४० किलो भुईमूग (शेंगदाणा) ची पेरणी केली होती. याकरिता त्यांना ५ हजार रुपयांच्या बियाण्यांसह १८ हजार रुपये खर्च आला. खत, निंदन, फवारणी, पाणी, मशागत आदींचे चोख व्यवस्थापन केल्याने व योग्य निगा राखल्याने भुईमुगाचे पीक चांगलेच बहरून आले होते. परंतु भुईमुगाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना वन्यप्राण्यांनी हल्ला चढविला व बहरलेले पीक आतून पोखरून टाकले. वन्यप्राण्यांमध्ये प्रामुख्याने वराह, सारस, रोही, माकड आदींचा समावेश आहे. सारस व वराह हे दोन्ही प्राणी जमीन उखरून आतील भरलेल्या भुईमुंगाच्या शेंगा फस्त करीत असे. तर माकड व रोही झाडे उपटून खायचे. यामुळे लागलेला खर्च तर सोडा पेरलेल्या बियाण्याइतकेसुद्धा शेंगदाणे झाले नाहीत.४० किलो शेंगदाणे पेरले आणि उत्पन्न झाले. ३० किलो उरले ते केवळ कुटारच. यामुळे शेतकरी डायरे यांना चांगलाच मोठा आर्थिक फटका बसला आहेत. करीता शासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डायरे यांनी केली आहे.तापमानात कमालीची वाढ झाली असूनसुद्धा शेतातील विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे भाजीपालावर्गीय पीक घ्यायची हिंमतच होत नाही.- किसना डायरे, शेतकरी, चिकणी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती