शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

गिरडवासी समस्यांनी ग्रस्त

By admin | Updated: April 19, 2015 01:55 IST

जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या आणि पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गिरड हे गाव सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे.

गिरड : जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या आणि पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गिरड हे गाव सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. टेकडीवरील सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. तसेच दारूचा महापूर आणि रस्त्याची दैना यामुळे नागरिक वैतागले आहे. समुद्रपूर राज्य मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण करून मार्गावर डांबरीकरण सुरू आहे. परंतु या रोडच्या बांधकामात डांबर अत्यल्प प्रमाणात वापरण्यात येत असल्याने लवकरच गिट्टी उखडून रोडवर खड्डे पडण्याची शक्यता व्यक्त आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी या रोडच्या डांबरीकरणाकडे लक्ष द्यावे तसेच कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला समज देऊन डांबरीकरण शासकीय नियमाप्रमाणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या आधीही या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीतच डांबर उखडून खड्डे पडल्याने आताही तशीच स्थिती होते की काय असा प्रश्न प्रवाशांना तसेच गिरडवासियांना पडला असून नागरिक यावर नाराजी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर) टेकडीवरील सौंदर्यीकरण निकृष्ट दर्जाचेगिरड टेकडीवर शासकीय निधीतून सौंदर्यीकरणांचे काम सुरू असून तेथे रस्त्याच्या कडेला गट्टू टाईल्स लावण्यात येणार आहे. परंतु या टाईल्स ईस्टिमेट नुसार लावल्या जात नसल्याची ओरड येथील नागरिक तसेच पर्यटक करीत आहे. काही ठिकाणच्या टाईल्स काम पूर्ण होण्यअगोदरच उखडल्या जात आहे. त्यामुळे सदर कामे केवळ औपचारिकता म्हणून सुरू आसल्याची ओरड पर्यटकांमधून केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून ठेकेदारांवर कार्यवाई करावी अशीर मागणी ग्रामस्थ तसेच पर्यटकांमधून केली जात आहे.