शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

तूर व चण्यावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:35 PM

जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचे दुष्परिणाम : दुर्लक्ष केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातच उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी एकूण सहा लाख एक हजार ५३७ हेक्टरवर तुरीची लागवड केली. सध्या तूर पीक फूलावर असून शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. या पिकावर सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर आता हिरव्याअळीनेही या पिकावर आक्रमण केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास ही परिस्थिती अधिक विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर चना पीक सध्या फुलोऱ्यावर आहे. सुरूवातीला ज्यांनी चन्याची लागवड केली त्यांच्या शेतातील उभे चना पीक सध्या घाट्या धरत असल्याचे दिसून येते. परंतु, याच पिकावर सध्या ढगाळी वातावरणामुळे हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर अळी ही सध्या चना पिकावर अगदी मुंगीच्या आकाराची असल्याचे कृषी तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे चना उत्पादनाकांनी तात्काळ कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.काही शेतकऱ्यांना बगळ्यावर विश्वासचन्यावर सध्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. हिरव्याअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आवश्यक औषधांची फवारणी केली आहे. परंतु, काही शेतकरी सदर अळी बगळे खात असल्याने फवारणीची गरज नसल्याचे बोलतात. असे असले तरी हिरव्या अळीला वेळीच नियंत्रणात आणले नाही तर उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.तापमान घसरल्याने तुरीवर विपरीत परिणामजिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव तूर पिकावर दिसून येत आहे. शिवाय दिवसेंदिवस तापमानात घट होत असून १० डिग्री पेक्षा कमीचे तापमान तूर पिकावर विपरीत परिणाम करणारे ठरते. काही शेतातील तूर पीक वाळत असल्याचे तसेच शेंगा पूर्णपणे भरत नसल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले आहे. तुरीला रात्रीचे तापमान १० डिग्रीपेक्षा कमी झालेले मानवत नाही. शिवाय इजा पोहोचून मर सुरू होते. हे टाळण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सायंकाळी उशीरा शेतात कोपऱ्यामध्ये शेकोटी पेटवावी. हा साधा प्रयोग फायद्याचा ठरणारा असल्याचे सांगण्यात येते.१३,१३९ हेक्टरवर गहू तर ३४,५७९ हेक्टरवर चण्याची लागवडयंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकºयांना चांगलाच फटका सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. त्यातच समाधानकारक पाऊस न झाल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेऱ्यात घट झाली आहे. यंदा १३ हजार १३९ हेक्टरवर गव्हाची तर ३४ हजार ५७९ हेक्टरवर चन्याची लागवड करण्यात आली आहे.कृषी विभागात क्लोरोफायरीफॉस ५० टक्के अनुदानावर उपलब्धतूर व चन्यावरील हिरव्याअळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्लोरोफायरीफॉस आणि क्विनॉलफॉसची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पिकावर करावी. सध्या क्लोरोफायरीफॉस कृषी विभागाकडे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. त्याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती