शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पवनारात भीषण आग; दोन कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:51 IST

येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आगीच्या तीन घटना : विद्यार्थ्याच्या सतर्कतेने घटना झाली उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली. त्या मुलाने दोन्ही कुटुंबातील सदस्यांना आवाज दिल्याने ते जागे व हा प्रकार लक्षात आला. अन्यथा या आगीत कुटूंबातील सदस्यांचा होरपळून मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती, असे गावकरी सांगत आहेत.या आगीत हेमराज हिवरे यांच्या घरातील ७० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तर उर्वरित कापूस पाण्यामुळे ओला होऊन खराब झाला आहे. इमारतीत असलेले सागवान लाकुड, शेतीसाहित्य, इमारतीचे फाटे सुद्धा जळून खाक झाले असून बºयाच घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात असलेले गॅस सिलिंडर वेळीच हटविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.आगीचे वृत्त गावात पसरताच ग्रा.पं.च्या वतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. बुधवार कोरडा दिवस असल्यामुळे बºयाच जणांकडे पाण्याचा साठा नव्हता, पाणीपुरवठा कर्मचारी सुरेश उमाटे याने लगेच पुरवठा सुरू करून ती अडचणही दूर केली. ग्रा.पं.चे सरपंच अजय गांडोळे, पं.स.सदस्य प्रमोद लाडे, माजी ग्रा. पं. सदस्य नितीन कवाडे हे आग विझेपर्यंत परिसरात ठाण मांडून बसले होते. पोलीस प्रशासनाच्यावतीने पांडे आपल्या चमुसह दाखल झाले. सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. परंतु एवढ्या पहाटे कारण नसताना आग कशी लागली हे मात्र कोडेच आहे.आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. योगेश तिमांडे, किरण गोमासे, अमोल भूत, मुकूंद करमकर, अनिल तिमांडे, उमेश हजारे, सचिन कराडे, किरण गुल्हाने, सुधाकर येरुणकर, रूपेश ठाकुर, दिनेश उराडे, दिलीप रोशन रघाटाटे, बंटी पठाण, किरण हिवरे, रोमहर्ष हिवरे, अनिकेत हिवरे, हर्षल हिवरे, सुरज कळमकर, प्रज्वल हजारे, गजानन हिवरे व इतर गावातील युवकांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.शाब्बास रे पठ्ठेहिवरे यांच्या शेजारी राहणारा तेजस मुकुंद करमरकर हा १५ वर्षाचा दहावीत शिकणारा मुलगा शिकवणीला जाण्यासाठी पहाटे ४.३० वाजता उठला असता त्याला शेजारील घरातून धूर बाहेर येताना दिसला. त्याने आरडा-ओरड करून सर्वप्रथम हिवरे कुटुंबियांना जागे करून आगीची सुचना दिली. साखर झोपेत असणाऱ्या हिवरे कुटुंबियांना आग लागल्याची खबर नव्हती. तेजसमुळे दोन्ही हिवरे कुटुंबियांचे प्राण बचावले.युवाशक्तीचे अतुलनीय कार्यआग लागून रौद्ररुप धारण करीत असल्याचे दिसताच गावातील युवाशक्तीने आपल्या अतुल शौर्याचा पराक्रम दाखवित आजुबाजूच्या विहिरीवरील मोटर पंप सुरू करुन आग पसरु न देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सोबतच त्यांना महिलावर्गांनी साथ देत आग विझविली. फायर ब्रिगेडसोबत संपर्क साधण्यात बराच वेळ लागला, तोपर्यंत युवाशक्ती व महिलावर्गाने आग बºयाच प्रमाणात आटोक्यात आणून तिला पसरण्यास बचाव केला. नाहीतर या आगीच्या विळख्यात बरीच घरे येऊन मोठी दुर्घटना घडली असती.बैलजोडी वाचलीसुधाकर येरुणकर व दिनेश उराडे यांनी प्रसंगावधान राखून गोठ्याचे कुलूप तोडून आगीतून बैलजोडीला बाहेर काढल्यामुळे बैलजोडी वाचली .घरी नसल्यामुळे प्राण वाचलेदौलतराव हिवरे सपत्नीक बाहेर गावी गेले असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांचे जळालेले घर बघून त्यांना बाहेर निघणे कठीण झाले असते.आगीत झालेले नुकसानया आगीत हेमराज हिवरे यांचा ४० क्विंटल कापूस, २ गव्हाचे पोते, २ ढेपीचे पोते, ४५ सागवान मयाली, स्प्रिकंलर पाईप, २ फवारणी यंत्र, शेतीसाहित्य व इमारतीच्या मयाली असे अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले.दौलतराव हिवरे यांच्या घरात असलेली ४० ते ४५ हजार रुपयांची रोकड, साखर, तांदुळ, दाळ, गहू, तेलाचे तीन पीपे व घराचे साहित्य असे एकूण ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.