शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मंजूर सिंचन विहिरींचे अनुदान अप्राप्त

By admin | Updated: December 30, 2014 23:41 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़

शेतकरी हवालदिल : कर्जाचा वाढला डोंगरवर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ तब्बल १४ शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम केले; पण अनुदान न मिळाल्याने आता शेती कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ गतवर्षी वर्धा जिल्ह्यात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून प्रत्येक ग्रा़पं़ अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना विहिरी मंजूर करण्यात आल्या़ वडनेर येथील १४ शेतकऱ्यांना यातील विहिरी मंजूर करण्यात आल्या़ शासनाची मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम करून घेतले; पण अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही़ वडनेरच्या शेतकऱ्यांचा मंजूर असलेल्या सिंचन विहिरींमध्ये समावेश असल्याने तत्कालीन शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहीर खोदकामाचे ले-आऊट करून दिले़ यानुसार शेतकऱ्यांनी स्वत: मजूर लावून सिंचन विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे़ यानंतर शेतकऱ्यांनी सिंचन विहीर खोदकामाच्या अनुदानाची मागणी केली असता दोन महिन्यांचे अनुदान देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते़ यानंतर मागील संपूर्ण कालावधी निवडणुकीचा असल्याने सध्या आचार संहिता सुरू आहे, तुमचे अनुदान देता येत नाही, असे सांगण्यात आले़ यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुका होईस्तोवर प्रतीक्षा केली़ आता शेतकरी वारंवार पंचायत समितीमध्ये चकरा मारून अनुदानाची मागणी करीत आहेत; पण शेतकऱ्यांनाच उलट उत्तरे दिली जात असल्याचे दिसते़ तुम्हाला सिंचन विहिरीचे खोदकाम कुणी करायला सांगितले, त्यांनाच अनुदान मागा, अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ वडनेर येथील संपूर्ण शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ शिवाय सिंचन विहीर खोदकामाची मजुरीही शेतकऱ्यांनी कर्ज काढून दिली़ यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)