शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

मंजूर सिंचन विहिरींचे अनुदान अप्राप्त

By admin | Updated: December 30, 2014 23:41 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़

शेतकरी हवालदिल : कर्जाचा वाढला डोंगरवर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ तब्बल १४ शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम केले; पण अनुदान न मिळाल्याने आता शेती कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ गतवर्षी वर्धा जिल्ह्यात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून प्रत्येक ग्रा़पं़ अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना विहिरी मंजूर करण्यात आल्या़ वडनेर येथील १४ शेतकऱ्यांना यातील विहिरी मंजूर करण्यात आल्या़ शासनाची मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम करून घेतले; पण अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही़ वडनेरच्या शेतकऱ्यांचा मंजूर असलेल्या सिंचन विहिरींमध्ये समावेश असल्याने तत्कालीन शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहीर खोदकामाचे ले-आऊट करून दिले़ यानुसार शेतकऱ्यांनी स्वत: मजूर लावून सिंचन विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे़ यानंतर शेतकऱ्यांनी सिंचन विहीर खोदकामाच्या अनुदानाची मागणी केली असता दोन महिन्यांचे अनुदान देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते़ यानंतर मागील संपूर्ण कालावधी निवडणुकीचा असल्याने सध्या आचार संहिता सुरू आहे, तुमचे अनुदान देता येत नाही, असे सांगण्यात आले़ यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुका होईस्तोवर प्रतीक्षा केली़ आता शेतकरी वारंवार पंचायत समितीमध्ये चकरा मारून अनुदानाची मागणी करीत आहेत; पण शेतकऱ्यांनाच उलट उत्तरे दिली जात असल्याचे दिसते़ तुम्हाला सिंचन विहिरीचे खोदकाम कुणी करायला सांगितले, त्यांनाच अनुदान मागा, अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ वडनेर येथील संपूर्ण शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ शिवाय सिंचन विहीर खोदकामाची मजुरीही शेतकऱ्यांनी कर्ज काढून दिली़ यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)