शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मंजूर सिंचन विहिरींचे अनुदान अप्राप्त

By admin | Updated: December 30, 2014 23:41 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़

शेतकरी हवालदिल : कर्जाचा वाढला डोंगरवर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ तब्बल १४ शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम केले; पण अनुदान न मिळाल्याने आता शेती कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ गतवर्षी वर्धा जिल्ह्यात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून प्रत्येक ग्रा़पं़ अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना विहिरी मंजूर करण्यात आल्या़ वडनेर येथील १४ शेतकऱ्यांना यातील विहिरी मंजूर करण्यात आल्या़ शासनाची मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम करून घेतले; पण अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही़ वडनेरच्या शेतकऱ्यांचा मंजूर असलेल्या सिंचन विहिरींमध्ये समावेश असल्याने तत्कालीन शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहीर खोदकामाचे ले-आऊट करून दिले़ यानुसार शेतकऱ्यांनी स्वत: मजूर लावून सिंचन विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे़ यानंतर शेतकऱ्यांनी सिंचन विहीर खोदकामाच्या अनुदानाची मागणी केली असता दोन महिन्यांचे अनुदान देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते़ यानंतर मागील संपूर्ण कालावधी निवडणुकीचा असल्याने सध्या आचार संहिता सुरू आहे, तुमचे अनुदान देता येत नाही, असे सांगण्यात आले़ यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुका होईस्तोवर प्रतीक्षा केली़ आता शेतकरी वारंवार पंचायत समितीमध्ये चकरा मारून अनुदानाची मागणी करीत आहेत; पण शेतकऱ्यांनाच उलट उत्तरे दिली जात असल्याचे दिसते़ तुम्हाला सिंचन विहिरीचे खोदकाम कुणी करायला सांगितले, त्यांनाच अनुदान मागा, अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ वडनेर येथील संपूर्ण शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ शिवाय सिंचन विहीर खोदकामाची मजुरीही शेतकऱ्यांनी कर्ज काढून दिली़ यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)