शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

ग्रामशक्ती अन् युवाशक्तीने पेटविली श्रमसंस्काराची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:56 IST

येथील शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ‘राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छ भारत अभियानासाठी युवाशक्ती’ शिबिर आर्वी तालुक्यातील पानवाडी येथे घेण्यात आले. या शिबिरातील युवक-युवतींनी युवाशक्तीसोबतच ग्रामशक्तीलाही सोबत घेत श्रमसंस्काराची ज्योत पेटविली आहे.

ठळक मुद्देपानवाडीवासीयांची जिंकली मने : जाजू महाविद्यालयाचे रासेयो शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ‘राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छ भारत अभियानासाठी युवाशक्ती’ शिबिर आर्वी तालुक्यातील पानवाडी येथे घेण्यात आले. या शिबिरातील युवक-युवतींनी युवाशक्तीसोबतच ग्रामशक्तीलाही सोबत घेत श्रमसंस्काराची ज्योत पेटविली आहे. ती ज्योत शिबिरानंतरही कायम असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.या शिबिराचे उद्घाटनाप्रसंगी प्रा.डॉ.झिले, सभापती शिला पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत उपस्थित होते. या शिबिराच्या कालावधीत ग्रामस्थ व शिबिरार्थ्यांनी श्रमसंस्कारांतर्गत गावातील नाल्यांचे खोलीकरण, रुंदिकरण व साफसफाई केली. नदीवरील बंधाऱ्यात साचलेला गाळ उपसून बंधारा मोकळा केला. गावातील रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यांची सफाई करुन ‘हगणदारी मुक्त गांव’ करण्यासाठी गावाबाहेरील रस्ताही स्वच्छ केला. कोंडवाडाही स्वच्छ करून ‘निर्मलग्राम व स्वच्छग्राम’ चा संदेशही शिबिरार्थ्यांनी आपल्या कार्यातून दिला. ग्रामसर्वेक्षणाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संवाद साधला. गावकºयांची आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी व आरोग्य निदान शिबिरही घेण्यात आले. पशुचिकित्सा कृती शिबिर, कृषी अवजार, ग्रंथप्रदर्शन व रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. गावकºयांसाठी विकासाची नांदी ठरलेल्या या शिबिराच्या समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत यांच्या अध्यक्षेतत झाला. यावेळी ग्रामस्थांसह शिबिरार्थ्यांनी आले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक व अहवाल वाचन शिबिर प्रमुख डॉ. राजेश देशपांडे यांनी केले. संचालन प्रा. सलीम शेख यांनी केले तर आभार प्रा. मिलिंद माने यांनी केले. या भावस्पर्शी सोहळ्यानंतर विविध रचनात्मक कार्याचा वसा आपल्या आयुष्यात जपण्याचा संकल्प शिबिरार्थ्यांनी केला. शिबिराच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. कालभूत यांच्या मार्गदर्शनात डॉ. राजेश देशपांडे, प्रा.मिलिंद माने, डॉ. किनखेडकर, डॉ. चौहान, प्रा.सॅम्युअल, प्रा. उपासे, प्रा.वरकल, प्रा. येल्टीवार, प्रा.घमेंडी, प्रा. जक्कुलवार, सरपंच वंदना ढोक, उपसरपंच मसराम, मुख्याध्यापक पेंडके, शेळके, उपप्राचार्य पवार, भुतडा, लाहोटी, अली, धुर्वे, पटेल, तुमडाम, ढोक, चोपडे, भिवगडे तसेच पानवाडी येथील ग्रामस्थ व शिबिरार्थ्यांनी सहकार्य केले.सकाळी जागर, तर रात्री प्रबोधनदररोज पहाटे मंगल भूपाळी व्हायची. चिंतनाचे हृदयस्पर्शी विचार घेऊन शिबिरार्थी आणि ग्रामस्थांची गावातून जागर दिंडी निघायची.‘चाहे धर्म अनेक है, देश हमारा एक है’,‘जर्दा गुटका पान मसाला, नव्या पिढीचा मौत मसाला’ आदी घोषणांनी व प्रेरणादायी ‘जोडो भारत जोडो भारत...’ या स्फू र्ती व जागरगीतांनी पानवाडीचा परिसर दुमदुमून जायचा. सायंकाळी मनोरंजनातून लोकप्रबोधन केले जायचे. रासेयोच्या सांस्कृतिक कलापथकाने भोंदूबाबाची भंबेरी, स्त्रीभ्रूणहत्या, गांधी तुम्हारे देश में, थांबा काय करता, आपण सारे एक, ग्रामस्वच्छता इत्यादी विषयावर पथनाट्य, नकला, जागरगीत, लोकनृत्य व देशभक्तीपर गीत सादर केलीत. सोबतच सप्तखंजिरी वादक भाऊसाहेब थुटे व शुभम मुरले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेण्यात आला. ग्रामस्थ, गुरुदेव सेवा मंडळ आणि पानवाडी, भादोडच्या शाळांचेही कार्यक्रम झालेत.तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मिळाली दिशाशिबिर कालावधीत प्रा. राजेंद्र खर्चे, डॉ. रवींद्र हवा, डॉ. प्रशांत धरपाल या तज्ज्ञांनी कृषीविषयक मार्गदर्शन केले. डॉ. गजानन पाटे, राहाटे व धाड यांनी डोळ्यांच्या आजाराबाबत माहिती दिली. तर विनेश काकडे यांनी ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. यासह परिसंवाद, गटचर्चा, समयस्फूर्त भाषण, सामाजिक खेळ आदी उपक्रमही राबविण्यात आले.