शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

बांधकामासाठी ग्रामपंचायतींना मिळणार २५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 19:18 IST

Vardha : सात ग्रामपंचायतींना इमारतीची गरज मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामीण भागातील गावपातळीवर विकासाच्या दृष्टीने काम करणारी महत्त्वात्ची संस्था म्हणून ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आहे. गावांचा विकास आणि ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे या विकासात्मक कामाला चालना देण्याकरिता ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता गावात चांगले ग्रामपंचायत भवन उभे राहावे, याकरिता शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद केली आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकणू १३८६ गावे असून या गावांचा विकास करण्याची जबाबदारी एकूण ५२१ ग्रामपंचायतींची आहेत. जिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामविकास साधला जात आहे. यापैकी सात ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत नसून त्यांच्याकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. विशेषत: ग्रामपंचायतींकडे इमारत असून ती जीर्ण झाली आहे किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे त्या इमारतीतून काम करण्यास ती अपुरी पडत असल्याने नवीन ग्रामपंचायत भवनाची मागणी केली जात आहे. या शासनाकडून निधी प्राप्त होताच या ग्रामपंचायतींच्या इमारतीही साकार होणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्वी १५ ते २० लाखांचाच निधी उपलब्ध होत होता. मात्र, आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद असल्याने या निधीतून सुसज्ज अशी इमारत साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२५ लाखापर्यंत इमारतींसाठी निधी ग्रामपंचायतींना शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामाकरिता मिळतो. ज्या गावांची लोकसंख्या २ हजारांवर आहे, त्यांच्याकरिता हा निधी असून, २ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील ग्रामपंचायतीकरिता २० लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) व आर्वी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ५२१ ग्रामपंचायती असून यापैकी सात ग्रामपंचायतींकडे सुसज्ज इमारत नसल्याची माहिती उपलब्ध आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत भवनाकरिता निधी उपलब्ध करून दिला जातो. आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी उपलब्ध होत असून, त्याला गावाच्या लोकसंख्येची अट घातली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच राहिलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामाकरिता निधी दिला जाईल.- डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि.प. वर्धा.

कोणत्या ग्रामपंयातींना नाही इमारतजिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण ५२१ ग्रामपंचायती असून, यापैकी दहा ग्रामपंचा यतींना ग्रामपंचायत भवन नव्हते. नुकताच आष्टी तालुक्यातील परसोडा आणि समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर व लाहोरी येथील ग्रामपंचायतींना भवन मिळाले आहे. आता देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे), खातखेडा, आर्वी तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) व पिपरी पुनर्वसन, आष्टी तालुक्यातील खडका, कारंजा तालुक्यातील मेठहिरजी व समुद्रपूर तालुक्यातील कवठा या सात गावांमध्ये ग्रामपंचायत भवनाची आवश्यकता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwardha-acवर्धा