शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

ग्रामपंचायतीचा ग्रामसभेला हरताळ

By admin | Updated: May 9, 2014 01:49 IST

विरूळ (आ़) : गावाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वर्षभरात होणाऱ्या ग्रामसभांपैकी तीन ते चार सभांना गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे शासनाचे आदेश आहेत

विरूळ (आ़) : गावाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वर्षभरात होणार्‍या ग्रामसभांपैकी तीन ते चार सभांना गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे शासनाचे आदेश आहेत; मात्र महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा विरूळ ग्रामपंचायतीने घेतलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आचारसंहितेचे कारण समोर करून ही ग्रामसभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आर्वी पंचायत समितीच्या अधिकार्‍याने सर्व ग्रामसेवकांना आचारसंहिता शिथील झाल्याचे संदेश देऊन ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते; पण विरूळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झालीच नसल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़ गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, ग्रामपंचायतीच्या सर्व कामांवर नागरिकांचे लक्ष असावे यासाठी शासनाने ग्रामसभांना महत्त्व दिले.

मतदार यादीत सर्वच नावे असलेल्यांना या ग्रामसभेत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. गावाच्या मतदार संखेच्या १५ टक्के अथवा १०० ग्रामस्थांनी या ग्रामसभेला उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ज्या दिवशी ग्रामसभा आहे, त्याच्या पहिल्या दिवशी गावातील नागरिकांना दवंडी देऊन कळविणेही आवश्यक आहे; पण विरूळ ग्रामपंचायतीद्वारे कुणालाही कळविण्यात आले नाही़ येथील ग्रामसेविका सकाळी झेंडावंदन करून लगेच गावी गेल्याने महत्त्वपूर्ण ग्रामसभा झालीच नाही. विकासाचा लेखाजोखा ग्रामसभेत मांडणे सक्तीचे झाले आहे. शिवाय कृषी विभागाच्या योजना, लाभार्थी निवड करण्यासह शैक्षणिक कामांबाबत गाव शैक्षणिक पंजिकेचे वाचन करणे गरजेचे आहे.

या ग्रामसभांना ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, पोलीस पाटील यांची उपस्थिती महत्त्वपूूर्ण मानली जाते. असे असताना ग्रामसभाच न घेतल्याने या ग्रामसभेला कुणीही उपस्थित राहिले नाही. शिवाय कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांनाही वाचा फोडता आली नाही़ यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ महत्त्वाची असलेली महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा न झाल्याने शासनाचा सक्त आदेश असताना विरूळ येथे ग्रामसभा न घेणार्‍यांवर वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)