शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

ग्रामपंचायतीचा ग्रामसभेला हरताळ

By admin | Updated: May 9, 2014 01:49 IST

विरूळ (आ़) : गावाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वर्षभरात होणाऱ्या ग्रामसभांपैकी तीन ते चार सभांना गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे शासनाचे आदेश आहेत

विरूळ (आ़) : गावाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वर्षभरात होणार्‍या ग्रामसभांपैकी तीन ते चार सभांना गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे शासनाचे आदेश आहेत; मात्र महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा विरूळ ग्रामपंचायतीने घेतलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आचारसंहितेचे कारण समोर करून ही ग्रामसभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आर्वी पंचायत समितीच्या अधिकार्‍याने सर्व ग्रामसेवकांना आचारसंहिता शिथील झाल्याचे संदेश देऊन ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते; पण विरूळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झालीच नसल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़ गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, ग्रामपंचायतीच्या सर्व कामांवर नागरिकांचे लक्ष असावे यासाठी शासनाने ग्रामसभांना महत्त्व दिले.

मतदार यादीत सर्वच नावे असलेल्यांना या ग्रामसभेत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. गावाच्या मतदार संखेच्या १५ टक्के अथवा १०० ग्रामस्थांनी या ग्रामसभेला उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ज्या दिवशी ग्रामसभा आहे, त्याच्या पहिल्या दिवशी गावातील नागरिकांना दवंडी देऊन कळविणेही आवश्यक आहे; पण विरूळ ग्रामपंचायतीद्वारे कुणालाही कळविण्यात आले नाही़ येथील ग्रामसेविका सकाळी झेंडावंदन करून लगेच गावी गेल्याने महत्त्वपूर्ण ग्रामसभा झालीच नाही. विकासाचा लेखाजोखा ग्रामसभेत मांडणे सक्तीचे झाले आहे. शिवाय कृषी विभागाच्या योजना, लाभार्थी निवड करण्यासह शैक्षणिक कामांबाबत गाव शैक्षणिक पंजिकेचे वाचन करणे गरजेचे आहे.

या ग्रामसभांना ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, पोलीस पाटील यांची उपस्थिती महत्त्वपूूर्ण मानली जाते. असे असताना ग्रामसभाच न घेतल्याने या ग्रामसभेला कुणीही उपस्थित राहिले नाही. शिवाय कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांनाही वाचा फोडता आली नाही़ यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ महत्त्वाची असलेली महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा न झाल्याने शासनाचा सक्त आदेश असताना विरूळ येथे ग्रामसभा न घेणार्‍यांवर वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)