शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

ग्रा.पं. स्तरावर गैरव्यवहार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:52 IST

ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या बैठकीत रणजित कांबळेंची अधिकाऱ्यांना तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. मंचावर पं.स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य मयुरी मसराम, पं.स. सदस्य अशोक इंगळे, शंकर उईके, कल्याणी ढोक, तहसीलदार तेजस्विनी जाधव व गटविकास अधिकारी बारापात्रे यांची उपस्थिती होती.मतदार संघातील काही गावे टंचाईग्रस्त होणार हे लक्षात घेवून अधिकाºयांनी कामाची गती वाढवावी. तसेच ग्रामपंचायतीने याबाबतचे ठराव तातडीने घेवून आतापासून नियोजन करावे, असे निर्देश आ. कांबळे यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले.आमचे सरकार योजनेंतर्गत ग्रा.पं. स्तरावर कार्यरत आॅपरेटरच्या कार्यपद्धतीवर आ. कांबळे यांनी ताशेरे ओढत याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना फैलावर घेतले. तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ६३ ग्रा.पं. मध्ये आॅपरेटर असलेच पाहिजे. कारण प्रत्येकी साडेबारा हजार याप्रमाणे ६३ आॅपरेटरचा पगार ग्रा.पं. च्या कोषातून जात आहे. परंतु प्रत्यक्षात फक्त ३७ आॅपरेटर कार्यरत आहे. उर्वरित आॅपरेटरचे पगार कुणाच्या तरी खिश्यात जात आहे, यानंतर असे जमणार नसल्याचे ते म्हणाले.ग्रा.पं. सरपंच व पदाधिकाºयांची संबंधित पाणी पुरवठा अधिकारी दिशाभूल करतात. ग्रा.पं.कडे थकीत पाणी पुरवठ्याबाबतच्या बिलाची पुर्वसूचना न देता ६-६ महिन्याचे बील एकाचवेळेस पाठविले जाते. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा अनेक तक्रारी सरपंचांनी आ. कांबळे यांच्या कानी घातल्या. बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता नाथे, सहा.भूवैद्यानिक डॉ. धाराशिवकर व इतर अधिकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.काजळसरा पाणीपुरवठा विहिरीने गाठला तळकाजळसरा येथे पाणी पुरवठ्याच्या विहिरीला फक्त ४ इंच क्षारयुक्त पाणी असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. ३५ वर्षांपुर्वीची ही विहीर असल्याने तीचे आयुष्य संपल्याची तक्रार करण्यात आली. लोणी येथील पाणीपुरवठा योजना सन १२-१३ ची असताना अद्याप पुर्णत्वास आली नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे