शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. स्तरावर गैरव्यवहार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:52 IST

ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या बैठकीत रणजित कांबळेंची अधिकाऱ्यांना तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. मंचावर पं.स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य मयुरी मसराम, पं.स. सदस्य अशोक इंगळे, शंकर उईके, कल्याणी ढोक, तहसीलदार तेजस्विनी जाधव व गटविकास अधिकारी बारापात्रे यांची उपस्थिती होती.मतदार संघातील काही गावे टंचाईग्रस्त होणार हे लक्षात घेवून अधिकाºयांनी कामाची गती वाढवावी. तसेच ग्रामपंचायतीने याबाबतचे ठराव तातडीने घेवून आतापासून नियोजन करावे, असे निर्देश आ. कांबळे यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले.आमचे सरकार योजनेंतर्गत ग्रा.पं. स्तरावर कार्यरत आॅपरेटरच्या कार्यपद्धतीवर आ. कांबळे यांनी ताशेरे ओढत याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना फैलावर घेतले. तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ६३ ग्रा.पं. मध्ये आॅपरेटर असलेच पाहिजे. कारण प्रत्येकी साडेबारा हजार याप्रमाणे ६३ आॅपरेटरचा पगार ग्रा.पं. च्या कोषातून जात आहे. परंतु प्रत्यक्षात फक्त ३७ आॅपरेटर कार्यरत आहे. उर्वरित आॅपरेटरचे पगार कुणाच्या तरी खिश्यात जात आहे, यानंतर असे जमणार नसल्याचे ते म्हणाले.ग्रा.पं. सरपंच व पदाधिकाºयांची संबंधित पाणी पुरवठा अधिकारी दिशाभूल करतात. ग्रा.पं.कडे थकीत पाणी पुरवठ्याबाबतच्या बिलाची पुर्वसूचना न देता ६-६ महिन्याचे बील एकाचवेळेस पाठविले जाते. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा अनेक तक्रारी सरपंचांनी आ. कांबळे यांच्या कानी घातल्या. बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता नाथे, सहा.भूवैद्यानिक डॉ. धाराशिवकर व इतर अधिकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.काजळसरा पाणीपुरवठा विहिरीने गाठला तळकाजळसरा येथे पाणी पुरवठ्याच्या विहिरीला फक्त ४ इंच क्षारयुक्त पाणी असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. ३५ वर्षांपुर्वीची ही विहीर असल्याने तीचे आयुष्य संपल्याची तक्रार करण्यात आली. लोणी येथील पाणीपुरवठा योजना सन १२-१३ ची असताना अद्याप पुर्णत्वास आली नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे