शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्ते योजनेवर शासनाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:44 IST

पालकमंत्री पांदण रस्ते योजना मे २०१७ पासून जिल्ह्यात अंमलात आली. आता राज्य शासनाने ही योजना स्वीकारून शेताची वहिवाट सोपी करण्यासाठी पुढाकार घेतला.

ठळक मुद्देशैलेश नवाल : वर्धा जिल्ह्याच्या पॅटर्नवर राज्यात होणार काम

ऑनलाईन लोकमतवर्धा : पालकमंत्री पांदण रस्ते योजना मे २०१७ पासून जिल्ह्यात अंमलात आली. आता राज्य शासनाने ही योजना स्वीकारून शेताची वहिवाट सोपी करण्यासाठी पुढाकार घेतला. वर्धा जिल्ह्यात या योजनेंतर्गत ८५ किमी पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. आता शासनाने या योजनेवर मोहोर लावल्याने राज्यभरातील पांदण रस्ते मोकळे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रपरिषदेत दिली.शेतकऱ्यांच्या तक्रारी, वारंवार होणारी भांडणे व वहिवाटीची अडचण या बाबी लक्षात घेत जिल्ह्यात पालकमंत्री पांदण रस्ते योजना हाती घेतली. ही योजना लोकसहभागातून राबविली जात आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना जेसीबीही उपलब्ध करून दिले. यात पांदण रस्ता मोकळा करायचा झाल्यास शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरून ठराविक रक्कम अदा करावी लागते. यानंतर शासन, कंपनी व लोकसहभागातून पांदण रस्ते मोकळे करून दिले जातात. जिल्ह्यात आजपर्यंत ८५ किमी पांदण रस्ते मोकळे करण्यात आले. पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी १९४ गावांतील २६१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यातील १०० शेतकºयांचे अर्ज निकाली काढत पांदण रस्ते मोकळे केले. याचा तीन हजार शेतकºयांना फायदा झाला असून १५० हेक्टर शेती वहिवाटीखाली आली. आणखी १६२ अर्ज प्रलंबित असून कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ३५० किमी पांदण रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २० जेसीबी उपलब्ध केले. यात ५ शासकीय तर १५ निवीदा मागवून भाडेतत्वावर घेतलेत. यातून दररोज ३ ते ४ किमी रस्ते मोकळे होत असून एक किमीसाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. आता राज्य शासनाने ही योजना स्वीकारली असून ती मनरेगा अंतर्गत राबविली जाईल. अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करीत कच्चा व पक्का रस्ता तयार करून दिला जाणार आहे. परिपत्रकात जबाबदारीही निश्चित केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी स्मिता पाटील, मनीषा सावळे उपस्थित होत्या.सिंचनासाठी कम्युनिटी सोलर प्रोजेक्टवर्धा जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून कम्यूनिटी सोलर प्रोजेक्ट राबविला जात आहे. यात सुकळी रिधोरा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी वापरले जाणार आहे. प्रकल्पातून पाणी बोथली आणि पिंपळगाव (भोसले) येथे आणून तेथे टाकीचे निर्माण केले जाईल. दोन्ही ठिकाणी सोलर पॅनलवरील ३० एचपीच्या दोन मोटर लावून पाईपलाईनद्वारे पाणी शेतात पोहोचविले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी चीन येथील चमूने पाहणी केली आहे. यातून कमी खर्चात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.७५० कोटींच्या पीक कर्जाचे नियोजनयंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून ७५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जवळपास सर्वांना कर्जमाफी मिळाल्याने यंदा कर्जवाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.कर्जमाफीचे ३१५ कोटी जमाशासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. त्यांच्या खात्यात ३१५ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आणखी २५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता २००८ च्या थकबाकीदारांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणणार आहे. यामुळे आणखी ४० कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.सहकारी बँकेसाठी प्रस्ताव पाठविणाररिझर्व्ह बँकेच्या निर्देशावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहार बंद करण्यात आले होते. आता शासनाकडून मदत तथा शेतकºयांना कर्जमाफी मिळाल्याने बँकेकडे बऱ्यापैकी भांडवल झाले आहे. यातून ४० टक्के ठेवीदारांना १४ कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे. कर्ज वाटपाच्या मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. सध्या गोल्ड लोन आणि सेक्यूअर्ड फायनान्स सिस्टीमद्वारे कर्जवाटप सुरू आहे.गावांतच बँकामायक्रो एटीएम व आधार लिंक बँकींगमुळे आता बँका गावोगावी पोहोचल्या आहेत. प्रत्येकाला शहरात जाऊन पैसे काढण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत जिल्ह्यात १२७ मायक्रो एटीएम केंद्र तर १४० आधार लिंक बेस बँकींग सुविधा उपलब्ध केल्या. यासाठी बचत-गटांचा आधार घेण्यात आला आहे. ग्रामस्थांना पैशासाठी भटकावे लागू नये म्हणून ५०० केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. या केंद्रांतून शेतकरी, ग्रामस्थांना ३ हजारांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.

टॅग्स :collectorतहसीलदार