शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शहरात शिदोरी आंदोलनातून वीस मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:43 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारत जोडो अभियान, महाराष्ट्र बचाव अभियान, भारतीय लोकशाही अभियान, महाविकास आघाडी वर्धा जिल्हा अंतर्गत शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला व बेरोजगार युवक आंदोलन समितीच्यावतीने विविध मागण्यांकरिता बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिदोरी आंदोलन करण्यात आले. तब्बल वीस मागण्यांकडे लक्ष वेधून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.

शेतीतील सर्व पीक उत्पादन किमान आधारभूत मूल्य नियमाच्या आधारावर મૂ~ किंमत घोषित करावी. शेतीतील सर्वच पिकांचा एमएसपीमध्ये सहभाग करावा. बाजारमूल्य व एमएसपीच्या भावातील भावांतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना बोनस द्यावे. शेतमाल खरेदीची रक्कम २४ तासांत शेतकऱ्यांना प्राप्त व्हावी. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा. पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जासाठी सिबिलची जाचक अट रद्द करावी. 

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार महिलांचे मायक्रो फायनान्स व न्सजगी सावकारी कर्ज सरकारने माफ करावे तसेच ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांना बिनव्याजी १ लाख रुपयापर्यंत कर्जाची व्यवस्था सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू करावी. मागील सर्व कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे. शेतीला २४ तास सलग विद्युत पुरवठा द्यावा. वर्तमान सदोष प्रधानमंत्री पीकविमा योजना रद्द करून राज्य व केंद्र सरकारने पीक विमा प्रीमियमची रक्कम दरवर्षी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करावी तसेच 'जिल्हाधिकारी पीक नुकसानभरपाई निधी योजना' सुरू करून त्यातून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करावी. 

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतीला सामूहिक चैनलिंगचे कुंपण करण्यात यावे. जीवितहानी झाल्यास २५ लाखांची व अपंगत्व आल्यास १० लाखांची तत्काळ मदत करावी. शेतीसाठी लागणारे सर्व उपकरण, साधन, साहित्य तसेच बियाणे, औषधी व निविष्ठांवरील शासनामार्फत लादण्यात आलेला जीएसटी टॅक्स तत्काळ रद्द करण्यात यावा. वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर घर करून राहत असलेल्या गरीब कुटुंबांना शासनाने रीतसर पट्टे नावे करून द्यावे, या मागणीसह वीस मागण्यांचे निवेदन शासनास पाठविण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला. या आदोलनाचे नेतृत्व यशवंत झाडे, अविनाश काकडे व हरीष इथापे यांनी केले असून, या आंदोलनात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना, विदर्भ विकास आघाडी, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, माकपा, जनवादी महिला संघटना, सीपीएम, आरपीआय, किसान अधिकार अभियान, मुस्लीम सोशल फोरम, आदिवासी कृती समिती, आधार संघटना, ओबीसी जनजागृती संघटना, वैद्यकीय जनजागृती मंच, कामगार कृती समिती, सत्यशोधक समाज यासह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता.

टॅग्स :wardha-acवर्धा