शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

शहरात शिदोरी आंदोलनातून वीस मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:43 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारत जोडो अभियान, महाराष्ट्र बचाव अभियान, भारतीय लोकशाही अभियान, महाविकास आघाडी वर्धा जिल्हा अंतर्गत शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला व बेरोजगार युवक आंदोलन समितीच्यावतीने विविध मागण्यांकरिता बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिदोरी आंदोलन करण्यात आले. तब्बल वीस मागण्यांकडे लक्ष वेधून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.

शेतीतील सर्व पीक उत्पादन किमान आधारभूत मूल्य नियमाच्या आधारावर મૂ~ किंमत घोषित करावी. शेतीतील सर्वच पिकांचा एमएसपीमध्ये सहभाग करावा. बाजारमूल्य व एमएसपीच्या भावातील भावांतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना बोनस द्यावे. शेतमाल खरेदीची रक्कम २४ तासांत शेतकऱ्यांना प्राप्त व्हावी. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा. पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जासाठी सिबिलची जाचक अट रद्द करावी. 

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार महिलांचे मायक्रो फायनान्स व न्सजगी सावकारी कर्ज सरकारने माफ करावे तसेच ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांना बिनव्याजी १ लाख रुपयापर्यंत कर्जाची व्यवस्था सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू करावी. मागील सर्व कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे. शेतीला २४ तास सलग विद्युत पुरवठा द्यावा. वर्तमान सदोष प्रधानमंत्री पीकविमा योजना रद्द करून राज्य व केंद्र सरकारने पीक विमा प्रीमियमची रक्कम दरवर्षी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करावी तसेच 'जिल्हाधिकारी पीक नुकसानभरपाई निधी योजना' सुरू करून त्यातून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करावी. 

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतीला सामूहिक चैनलिंगचे कुंपण करण्यात यावे. जीवितहानी झाल्यास २५ लाखांची व अपंगत्व आल्यास १० लाखांची तत्काळ मदत करावी. शेतीसाठी लागणारे सर्व उपकरण, साधन, साहित्य तसेच बियाणे, औषधी व निविष्ठांवरील शासनामार्फत लादण्यात आलेला जीएसटी टॅक्स तत्काळ रद्द करण्यात यावा. वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर घर करून राहत असलेल्या गरीब कुटुंबांना शासनाने रीतसर पट्टे नावे करून द्यावे, या मागणीसह वीस मागण्यांचे निवेदन शासनास पाठविण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला. या आदोलनाचे नेतृत्व यशवंत झाडे, अविनाश काकडे व हरीष इथापे यांनी केले असून, या आंदोलनात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना, विदर्भ विकास आघाडी, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, माकपा, जनवादी महिला संघटना, सीपीएम, आरपीआय, किसान अधिकार अभियान, मुस्लीम सोशल फोरम, आदिवासी कृती समिती, आधार संघटना, ओबीसी जनजागृती संघटना, वैद्यकीय जनजागृती मंच, कामगार कृती समिती, सत्यशोधक समाज यासह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता.

टॅग्स :wardha-acवर्धा