शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

आंदोलनांची दडपशाही करणारे सरकार

By admin | Updated: October 25, 2016 02:03 IST

आपली प्रतिमा उजळण्यासाठी अब्जावधी खर्च करता, भांडवलदारांना पोसण्याचे कामही तुम्ही करता, मात्र

वर्धा : आपली प्रतिमा उजळण्यासाठी अब्जावधी खर्च करता, भांडवलदारांना पोसण्याचे कामही तुम्ही करता, मात्र शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच तुमची सरकारी तिजोरी रिकामी कशी असते? सामाजिक आंदोलनांची दडपशाही करणारे हे नकली राष्ट्रभक्तांचे सरकार आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ पुरोगामी नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी प्राचार्य दिनकर मेघे स्मृती व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना केली. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात ‘वर्तमानकालीन राजकारण आणि सामाजिक आंदोलनांचे भवितव्य’ या विषयावर त्यांनी परखड विचारांची मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले तर अतिथी म्हणून सविता मेघे, अ‍ॅड. नत्थु ढेंगरे, प्राचार्य अ‍ॅड. अशोक पावडे उपस्थित होते. वर्तमानकालीन स्थित्यंतरांवर भाष्य करताना वृंदा करात म्हणाल्या, सरकारला सवैधानिक जाबाबदाऱ्यांचे भान ठेवावे लागते, याची जाणीवच सरकारला नाही. मोदी सरकार केवळ एक मुखवटा आहे, हा देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवित आहे. स्त्री स्वातंत्र्य नाकारणारे, अल्पसंख्यांकांचे हक्क नाकारणारे आणि ज्यांचा दुरान्वये स्वातंत्र्यलढयाशी संबंध नव्हता, असे श्यामप्रसाद मुखर्जी आज सरकारचा आदर्श झाले आहेत. कधी पोषाखावरुन तर कधी धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर स्त्रियांना हीनत्व देणाऱ्या घटकांविरुद्धही पुन्हा व्यापक लढा उभा करण्याची वेळ आली आहे. जगभरातील भांडवलशाही देश आपल्याच नागरिकांना रोजगार देऊ शकत नाहीत तर इथल्या तरुणांना संधी कशी मिळेल? उलट भारतीयांना आपल्या देशात परत पाठविणे सुरू झाले आहे. भारतात गुंतवणुकीची कुणाचीच मानसिकता नाही.