शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आंदोलनांची दडपशाही करणारे सरकार

By admin | Updated: October 25, 2016 02:03 IST

आपली प्रतिमा उजळण्यासाठी अब्जावधी खर्च करता, भांडवलदारांना पोसण्याचे कामही तुम्ही करता, मात्र

वर्धा : आपली प्रतिमा उजळण्यासाठी अब्जावधी खर्च करता, भांडवलदारांना पोसण्याचे कामही तुम्ही करता, मात्र शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच तुमची सरकारी तिजोरी रिकामी कशी असते? सामाजिक आंदोलनांची दडपशाही करणारे हे नकली राष्ट्रभक्तांचे सरकार आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ पुरोगामी नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी प्राचार्य दिनकर मेघे स्मृती व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना केली. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात ‘वर्तमानकालीन राजकारण आणि सामाजिक आंदोलनांचे भवितव्य’ या विषयावर त्यांनी परखड विचारांची मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले तर अतिथी म्हणून सविता मेघे, अ‍ॅड. नत्थु ढेंगरे, प्राचार्य अ‍ॅड. अशोक पावडे उपस्थित होते. वर्तमानकालीन स्थित्यंतरांवर भाष्य करताना वृंदा करात म्हणाल्या, सरकारला सवैधानिक जाबाबदाऱ्यांचे भान ठेवावे लागते, याची जाणीवच सरकारला नाही. मोदी सरकार केवळ एक मुखवटा आहे, हा देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवित आहे. स्त्री स्वातंत्र्य नाकारणारे, अल्पसंख्यांकांचे हक्क नाकारणारे आणि ज्यांचा दुरान्वये स्वातंत्र्यलढयाशी संबंध नव्हता, असे श्यामप्रसाद मुखर्जी आज सरकारचा आदर्श झाले आहेत. कधी पोषाखावरुन तर कधी धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर स्त्रियांना हीनत्व देणाऱ्या घटकांविरुद्धही पुन्हा व्यापक लढा उभा करण्याची वेळ आली आहे. जगभरातील भांडवलशाही देश आपल्याच नागरिकांना रोजगार देऊ शकत नाहीत तर इथल्या तरुणांना संधी कशी मिळेल? उलट भारतीयांना आपल्या देशात परत पाठविणे सुरू झाले आहे. भारतात गुंतवणुकीची कुणाचीच मानसिकता नाही.