शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:42 IST

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सहाव्या दिवशी सेवाग्राम चौक येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात खोटी आश्वासने देत हे खोटारडे सरकार आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसत आहे. यवतमाळ फवारणी करताना शेतकऱ्यांचा बळी गेला.आया-बहिणींची कुंकू पुसली जात असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भाची भूमी सरकारवर हल्लाबोल करायला निवडली आहे.या हल्लाबोलचा समारोप १२ डिसेंबरला करून आम्ही थांबणार नाही, तर त्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरूच ठेवणार आहे.सरकारचा खोटरडेपणा जनतेसमोर प्रभावीपणे मांडणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.यावेळी मोबाईलचे प्लॅशलाईट पेटवून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सुरेश देशमुख,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार गुलाबराव गावंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, प्रवक्ते महेश तपासे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवती, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.