शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

शेतकऱ्यांप्रती सरकार कुंभकर्णी झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:17 IST

विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी व कष्टकऱ्यांची उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सादर केले.शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आर्वी, आष्टी व कारंजा या विभागातील शेतकरी, बेरोजगार तरूण, शेतमजुरांनी आ. अमर काळे यांच्या नेतृत्त्वात एकत्र येत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले.आर्वी उपविभागातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. या अल्पसाठ्यात सिंचनाची सोय कशी होणार, नापिकी, बोंडअळीचे अनुदान प्रकल्पग्रस्तांना एक रकमी १० लाखांची मदत या सर्व परिस्थितीची जाण या सरकारला व्हावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आ. काळे यांनी सांगितले.आर्वी, आष्टी, कारंजा हे तीनही तालुके मध्यम दुष्काळ म्हणून जाहीर केले आहे. ते तीव्र दुष्काळ म्हणून जाहीर करावे. याची दखल शासनाने घेतली नाही तर पुढच्या काळात याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही याप्रसंगी त्यांनी दिला. शेतकऱ्याप्रती हे सरकार लबाडी करीत असल्याचा आरोप यावेळी आ. काळे यांनी केला.मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा असताना मुख्यमंत्रीही शेतकºयांच्या मदतीप्रती उदासीन आहे. तर दुसरीकडे नागपूर-मुंबई या समृद्धी मार्गासाठी ४६ करोडचा निधी खर्च करण्यात येत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. याबाबत पुढील काळात दुष्काळाची लढाई तीव्र करू. आर्वी उपविभागातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांना १० लाखांची मदत करण्यात यावी. बोंडअळीचे अनुदान त्वरीत द्यावे. दिवसा १० तास विद्युत पुरवठा कृषीपंपांना देण्यात यावा, आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या आहेत. सभेचे सभेचे संचालन प्रा. पंकज वाघमारे यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार