शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांप्रती सरकार कुंभकर्णी झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:17 IST

विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी व कष्टकऱ्यांची उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सादर केले.शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आर्वी, आष्टी व कारंजा या विभागातील शेतकरी, बेरोजगार तरूण, शेतमजुरांनी आ. अमर काळे यांच्या नेतृत्त्वात एकत्र येत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले.आर्वी उपविभागातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. या अल्पसाठ्यात सिंचनाची सोय कशी होणार, नापिकी, बोंडअळीचे अनुदान प्रकल्पग्रस्तांना एक रकमी १० लाखांची मदत या सर्व परिस्थितीची जाण या सरकारला व्हावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आ. काळे यांनी सांगितले.आर्वी, आष्टी, कारंजा हे तीनही तालुके मध्यम दुष्काळ म्हणून जाहीर केले आहे. ते तीव्र दुष्काळ म्हणून जाहीर करावे. याची दखल शासनाने घेतली नाही तर पुढच्या काळात याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही याप्रसंगी त्यांनी दिला. शेतकऱ्याप्रती हे सरकार लबाडी करीत असल्याचा आरोप यावेळी आ. काळे यांनी केला.मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा असताना मुख्यमंत्रीही शेतकºयांच्या मदतीप्रती उदासीन आहे. तर दुसरीकडे नागपूर-मुंबई या समृद्धी मार्गासाठी ४६ करोडचा निधी खर्च करण्यात येत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. याबाबत पुढील काळात दुष्काळाची लढाई तीव्र करू. आर्वी उपविभागातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांना १० लाखांची मदत करण्यात यावी. बोंडअळीचे अनुदान त्वरीत द्यावे. दिवसा १० तास विद्युत पुरवठा कृषीपंपांना देण्यात यावा, आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या आहेत. सभेचे सभेचे संचालन प्रा. पंकज वाघमारे यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार