शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतकऱ्यांप्रती सरकार कुंभकर्णी झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:17 IST

विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी व कष्टकऱ्यांची उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सादर केले.शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आर्वी, आष्टी व कारंजा या विभागातील शेतकरी, बेरोजगार तरूण, शेतमजुरांनी आ. अमर काळे यांच्या नेतृत्त्वात एकत्र येत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले.आर्वी उपविभागातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. या अल्पसाठ्यात सिंचनाची सोय कशी होणार, नापिकी, बोंडअळीचे अनुदान प्रकल्पग्रस्तांना एक रकमी १० लाखांची मदत या सर्व परिस्थितीची जाण या सरकारला व्हावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आ. काळे यांनी सांगितले.आर्वी, आष्टी, कारंजा हे तीनही तालुके मध्यम दुष्काळ म्हणून जाहीर केले आहे. ते तीव्र दुष्काळ म्हणून जाहीर करावे. याची दखल शासनाने घेतली नाही तर पुढच्या काळात याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही याप्रसंगी त्यांनी दिला. शेतकऱ्याप्रती हे सरकार लबाडी करीत असल्याचा आरोप यावेळी आ. काळे यांनी केला.मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा असताना मुख्यमंत्रीही शेतकºयांच्या मदतीप्रती उदासीन आहे. तर दुसरीकडे नागपूर-मुंबई या समृद्धी मार्गासाठी ४६ करोडचा निधी खर्च करण्यात येत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. याबाबत पुढील काळात दुष्काळाची लढाई तीव्र करू. आर्वी उपविभागातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांना १० लाखांची मदत करण्यात यावी. बोंडअळीचे अनुदान त्वरीत द्यावे. दिवसा १० तास विद्युत पुरवठा कृषीपंपांना देण्यात यावा, आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या आहेत. सभेचे सभेचे संचालन प्रा. पंकज वाघमारे यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार