शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

शासनाने पूरग्रस्तांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे

By admin | Updated: September 3, 2015 01:49 IST

शासनाने पूरग्रस्तांना दिलेल्या भूखंडाचे कायमस्वरूपी पट्टे देण्याचा तसेच नगर भूमापन करून आखीव पत्रिका पुरविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाला दिला होता.

मागणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला भूमिअभिलेख कार्यालयाकडून केराची टोपलीहिंगणघाट : शासनाने पूरग्रस्तांना दिलेल्या भूखंडाचे कायमस्वरूपी पट्टे देण्याचा तसेच नगर भूमापन करून आखीव पत्रिका पुरविण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाला दिला होता. या आदेशाला आठ महिन्यांचा काळ लोटूनही भूमी अभिलेख कार्यालयाने कोणतीही कारवाई केलेली नाही. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचे आक्षेप किसान अधिकार अभियानने उपविभागीय अधिकारी भुगावकर यांना सादर केलेल्या निवेदनातून घेतला आहे. ३० दिवसात आखीव पत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. शहरातील पूरपीडित नागरिकांना १९७९ मध्ये भूखंड वाटप करण्यात आले होते, परंतु त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात न आल्याने त्यांना कायदेशीर हक्क मिळाला नाही. किसान अधिकार अभियानचे तालुकाध्यक्ष प्रवीण उपासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यावर ८ जानेवारी २०१५ ला जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांना नगर भूमापन करून आखीव पत्रिका पुरपीडितांना पुरविण्याचा एक आदेश पारित केला होता. या आदेशात कारवाई संदर्भात पुरग्रस्तांची एक बैठक बोलावून या भूखंड वाटपाच्या वेळी शासनाने वाटप केलेले करारनामे जमा करून एक महिन्याच्या आता रेकॉर्ड तयार करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर पूरपीडित नागरिक कार्यवाहीची आशा बाळगून होते. मात्र संबंधित विभागाने आठ महिन्यांचा काळ लोटूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. पूरग्रस्तांजवळ आपल्या भूखंडाचे कोणतेही शासकीय कागदपत्रे नसल्याने त्यांना महत्वाच्या कामाकरिता या जागेची विक्री व गहाणपत्रे करता येत नाही. मुला-मुलींच्या शिक्षणाकरिता, कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणात या भूखंडावर पैसे मिळू शकत नाही. सदर भूखंडाच्या मालकीबाबत कोणताही कायदेशीर पुरावा नसल्याने पूरग्रस्त आर्थीक अडचणीत सापडले आहे. याबाबत शासकीय यंत्रणेला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला भूमी अभिलेख कार्यालयाने केराची टोपली दाखविली, असा आरोप निवेदनातून केला आहे. शिष्टमंडळात किसान अधिकार अभियानचे तालुकाध्यक्ष प्रवीण उपासे, प्रमोद गोहाणे, धनंजय बकाणे, किशोर भोयर, शेख रमजान, प्रवीण कोल्हे, मनोहर ब्राह्मणवाडे, कृष्णा पोगले, सिकंदर आमगे, संदीप आमगे, अमोल बाणाइत, वारीस उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)