शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:38 IST

ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मुल सांभाळता, सांभाळता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चुलीत जळणार सरपण व त्यामुळे होणारा धूर यामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनक्रिया, अस्थमा, नेत्ररोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागत.

ठळक मुद्देरामदास तडस : उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वाटप

आॅनलाईन लोकमतपुलगाव : ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मुल सांभाळता, सांभाळता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चुलीत जळणार सरपण व त्यामुळे होणारा धूर यामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनक्रिया, अस्थमा, नेत्ररोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागत. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पहिल्याच अर्थसंकल्पात उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेचा प्रस्ताव पारित करून पाच कोटी गॅस जोडणी देण्याची घोषणा केली. अर्थसंकल्पातील सर्व योजना लोकोपयोगी असून जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.ईशा गॅस एजेन्सीद्वारे आयोजित उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, सात वर्षाच्या आधी झालेल्या सर्वेक्षणानुसार गॅस कनेक्शन देण्यात आले तरी त्याचा लाभ गरजू व योग्य लाभार्थ्यांना मिळत आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान घरकूल योजना कार्यान्वित केली. कॉँग्रेस सरकारने ६० वर्षांच्या काळात गरीबांना घरकूल दिले नाही. परंतु भाजपा सरकार २०२२ पर्यंत सर्वच गरजू घटकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.पी.जी. डेप्युटी जनरल मॅनेजर नागपूर विभाग अधिकारी प्रमोद काटकर होते. त्यांनी केंद्राच्या उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेबाबत सर्व माहिती दिली. राजेश बकाने भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मंचावर नगराध्यक्षा शितल गाते, नाचणगाव सरपंच सविता गावंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रविण सावरकर, देवळी पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, माधुरी इंगळे, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, राहुल चोपडा, नितीन बडगे, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, गटनेता राजेश जायस्वाल, सुरेश सुखिजा, संतोष तिवारी, आकाश दुबे, श्रवण तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात कौशिक पचारे आपटी, शोभा बावने आगरगाव, आमीदाबी पठाण नाचणगाव, अंजना कामठे आगरगाव, लहनाबाई येवते शेंदरी, प्रमिला सरोडे नाचणगाव, मंगला कपट सोनोरा, कांता नारनवरे विजयगोपाल, इंदु कपट सोनोरा (ढोक) व गंगाबाई पचारे दहेगाव (धांदे) या ग्रामीण भागातील महिलांना उज ज्वला गॅस कनेक्शन योजने अंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले.मान्यवरांचे स्वागत ईशा गॅस एजेन्सीचे संचालक राजीव बतरा यांनी केले. कार्यक्रमाला एल.पी.जी. गॅसचे चंद्रपूर येथील व्यवस्थापक सिताराम गुप्ता, विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.