शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

सरकारी धोरणाने विद्यार्थी-युवकांवर बेरोजगारी लादली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:24 IST

केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे.

ठळक मुद्देयशवंत झाडे : केळझरच्या बाजार चौकात विद्यार्थ्यांची सभा

ऑनलाईन लोकमतकेळझर : केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे. दुसरीकडे अथक परिश्रमाने शिक्षण पूर्ण केलेल्या तरूणांना सरकारी नोकºया उपलब्ध नाहीत. त्यामुळे घरोघरी बेरोजगारीची समस्या निर्माण झाल्याचे प्रतिपादन एसएफआयचे पूर्व राज्य अध्यक्ष तथा वर्धेचे नगरसेवक केळझर येथे बाजार चौकात झालेल्या जाहीर सभेत यशवंत झाडे यांनी व्यक्त केले.शिक्षण व बरोजगारी या प्रश्नावर नागपूर ते सोलापूर असा विद्यार्थी-युवक जागर जत्था काढण्यात आला. सदर जत्था केळझर येथे पोहचला असता येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी केळझरचे माजी जिल्हा परिषद सदस्य महानामा रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणून सिटूचे सिताराम लोहकरे, जत्था प्रमुख कुणाल सावंत (नागपूर), सचिन रंगारी (भंडारा), अमित हटवार (रामटेक), सागर महाले (नागपूर), प्रिया वडेकर (वर्धा), राहुल खंडाळकर (वर्धा), संजय भोयर, सुनील घिमे, प्रितम हिराणी, समीर बोरकर, संजय भगत, मोनाली मेश्राम, पांडुरंग राऊत यांची उपस्थिती होती.देशांत बोटावर मोजण्याइतक्या लोकांची संपत्ती वाढत आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतो. नोटबंदीमुळे कारखाने बंद होत असून कामगार बेकार झाले. काळा पैसा हुडकून काढून १५ लाख रुपये प्रत्येकाचे खात्यावर येईल, ही घोषणाही पोकळ निघाली. दलितांवरील अन्यायात वाढ होत आहे. शिक्षण घरोघरी नि:शुल्क मिळेल. रोजगार उपलब्ध होईल, अशी व्यवस्था होत नाही. मौलिक मुद्दे सोडून इतर मुद्दे उकरून मुख्य मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. याविरूद्ध संघटीत झाले पाहिजेख असे मत सेभेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य महानामा रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सिताराम लोहकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार मोनाली मेश्राम हिने माणले. हा जत्था, पुढे वर्धा-कारंजा आष्टी येथे सभा-प्रचार करीत अमरावतीकडे रवाना झाला. कार्यक्रमाकरिता अमित खोब्रागडे, प्रवीण पाटील, अमोल ठाकरे, सोमलाल रहांगडाले, निलीमा अंबागडे, सुनिता कांबळे, अर्चना गायधने यांच्यासह आयोजकांनी प्रयत्न केले.