शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सरकारी धोरणाने विद्यार्थी-युवकांवर बेरोजगारी लादली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:24 IST

केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे.

ठळक मुद्देयशवंत झाडे : केळझरच्या बाजार चौकात विद्यार्थ्यांची सभा

ऑनलाईन लोकमतकेळझर : केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे. दुसरीकडे अथक परिश्रमाने शिक्षण पूर्ण केलेल्या तरूणांना सरकारी नोकºया उपलब्ध नाहीत. त्यामुळे घरोघरी बेरोजगारीची समस्या निर्माण झाल्याचे प्रतिपादन एसएफआयचे पूर्व राज्य अध्यक्ष तथा वर्धेचे नगरसेवक केळझर येथे बाजार चौकात झालेल्या जाहीर सभेत यशवंत झाडे यांनी व्यक्त केले.शिक्षण व बरोजगारी या प्रश्नावर नागपूर ते सोलापूर असा विद्यार्थी-युवक जागर जत्था काढण्यात आला. सदर जत्था केळझर येथे पोहचला असता येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी केळझरचे माजी जिल्हा परिषद सदस्य महानामा रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणून सिटूचे सिताराम लोहकरे, जत्था प्रमुख कुणाल सावंत (नागपूर), सचिन रंगारी (भंडारा), अमित हटवार (रामटेक), सागर महाले (नागपूर), प्रिया वडेकर (वर्धा), राहुल खंडाळकर (वर्धा), संजय भोयर, सुनील घिमे, प्रितम हिराणी, समीर बोरकर, संजय भगत, मोनाली मेश्राम, पांडुरंग राऊत यांची उपस्थिती होती.देशांत बोटावर मोजण्याइतक्या लोकांची संपत्ती वाढत आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतो. नोटबंदीमुळे कारखाने बंद होत असून कामगार बेकार झाले. काळा पैसा हुडकून काढून १५ लाख रुपये प्रत्येकाचे खात्यावर येईल, ही घोषणाही पोकळ निघाली. दलितांवरील अन्यायात वाढ होत आहे. शिक्षण घरोघरी नि:शुल्क मिळेल. रोजगार उपलब्ध होईल, अशी व्यवस्था होत नाही. मौलिक मुद्दे सोडून इतर मुद्दे उकरून मुख्य मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. याविरूद्ध संघटीत झाले पाहिजेख असे मत सेभेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य महानामा रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सिताराम लोहकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार मोनाली मेश्राम हिने माणले. हा जत्था, पुढे वर्धा-कारंजा आष्टी येथे सभा-प्रचार करीत अमरावतीकडे रवाना झाला. कार्यक्रमाकरिता अमित खोब्रागडे, प्रवीण पाटील, अमोल ठाकरे, सोमलाल रहांगडाले, निलीमा अंबागडे, सुनिता कांबळे, अर्चना गायधने यांच्यासह आयोजकांनी प्रयत्न केले.