शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सरकारी धोरणाने विद्यार्थी-युवकांवर बेरोजगारी लादली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:24 IST

केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे.

ठळक मुद्देयशवंत झाडे : केळझरच्या बाजार चौकात विद्यार्थ्यांची सभा

ऑनलाईन लोकमतकेळझर : केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे. दुसरीकडे अथक परिश्रमाने शिक्षण पूर्ण केलेल्या तरूणांना सरकारी नोकºया उपलब्ध नाहीत. त्यामुळे घरोघरी बेरोजगारीची समस्या निर्माण झाल्याचे प्रतिपादन एसएफआयचे पूर्व राज्य अध्यक्ष तथा वर्धेचे नगरसेवक केळझर येथे बाजार चौकात झालेल्या जाहीर सभेत यशवंत झाडे यांनी व्यक्त केले.शिक्षण व बरोजगारी या प्रश्नावर नागपूर ते सोलापूर असा विद्यार्थी-युवक जागर जत्था काढण्यात आला. सदर जत्था केळझर येथे पोहचला असता येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी केळझरचे माजी जिल्हा परिषद सदस्य महानामा रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणून सिटूचे सिताराम लोहकरे, जत्था प्रमुख कुणाल सावंत (नागपूर), सचिन रंगारी (भंडारा), अमित हटवार (रामटेक), सागर महाले (नागपूर), प्रिया वडेकर (वर्धा), राहुल खंडाळकर (वर्धा), संजय भोयर, सुनील घिमे, प्रितम हिराणी, समीर बोरकर, संजय भगत, मोनाली मेश्राम, पांडुरंग राऊत यांची उपस्थिती होती.देशांत बोटावर मोजण्याइतक्या लोकांची संपत्ती वाढत आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतो. नोटबंदीमुळे कारखाने बंद होत असून कामगार बेकार झाले. काळा पैसा हुडकून काढून १५ लाख रुपये प्रत्येकाचे खात्यावर येईल, ही घोषणाही पोकळ निघाली. दलितांवरील अन्यायात वाढ होत आहे. शिक्षण घरोघरी नि:शुल्क मिळेल. रोजगार उपलब्ध होईल, अशी व्यवस्था होत नाही. मौलिक मुद्दे सोडून इतर मुद्दे उकरून मुख्य मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. याविरूद्ध संघटीत झाले पाहिजेख असे मत सेभेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य महानामा रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सिताराम लोहकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार मोनाली मेश्राम हिने माणले. हा जत्था, पुढे वर्धा-कारंजा आष्टी येथे सभा-प्रचार करीत अमरावतीकडे रवाना झाला. कार्यक्रमाकरिता अमित खोब्रागडे, प्रवीण पाटील, अमोल ठाकरे, सोमलाल रहांगडाले, निलीमा अंबागडे, सुनिता कांबळे, अर्चना गायधने यांच्यासह आयोजकांनी प्रयत्न केले.