शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

‘त्या’ शासन आदेशाची आर्वीत केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:16 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदविला.

ठळक मुद्देआयटकचे आंदोलन : निर्णय मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदविला. हे आंदोलन मंगला इंगोले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले जात असून ६ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुला-मुलींना शिक्षणाचे धडे दिले जातात. शहरांमध्ये कॉन्व्हेंटचे क्रेझ वाढत असले तरी गावागावात अजूनही अंगणवाडीचे महत्त्व कायम आहे. सध्याच्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अशातच सरकारचा सदर निर्णय अंगणवाडी कर्मचाºयांच्या जीवावर उठल्याचा आरोप करीत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणारा १६ जुलैला काढलेल्या शासन निर्णय जाळून अंगणवाडी कर्मचाºयांनी आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात मैना उईके, विजया पावडे, वंदना कोळणकर, ज्योती कुलकर्णी, सुषमा कवाडे, आशा चतुर, अरुणा राठोड, ममता देशकर, ज्योती गूजराम, राजेश इंगोले, विश्रांती डेंगरे, प्रमीला मनोहर, मालती आवटे, सुनंदा खडसे, अनिता भगत, रुषाली बोकडे, सुलभा तिरभाने, मिना ढोके यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.आश्वासनाची पूर्तता केव्हा ?निवडणुकीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. परंतु, त्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. शिवाय अंगणवाडी केंद्रांचे खाजगीकरण करण्याची धमकीच दिली जात आहे. केंद्र सरकारने २०११ नंतर एक रुपया मानधनात वाढ केलेली नाही. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रतीदिन वेतनासह पीएफ व ईऐसआय देण्याची घोषणा केली होती. परंतु, अजूनही तसा शासन आदेश निर्गमित करण्यात आला नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :Governmentसरकार