शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

‘त्या’ शासन आदेशाची आर्वीत केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:16 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदविला.

ठळक मुद्देआयटकचे आंदोलन : निर्णय मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदविला. हे आंदोलन मंगला इंगोले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले जात असून ६ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुला-मुलींना शिक्षणाचे धडे दिले जातात. शहरांमध्ये कॉन्व्हेंटचे क्रेझ वाढत असले तरी गावागावात अजूनही अंगणवाडीचे महत्त्व कायम आहे. सध्याच्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अशातच सरकारचा सदर निर्णय अंगणवाडी कर्मचाºयांच्या जीवावर उठल्याचा आरोप करीत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणारा १६ जुलैला काढलेल्या शासन निर्णय जाळून अंगणवाडी कर्मचाºयांनी आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात मैना उईके, विजया पावडे, वंदना कोळणकर, ज्योती कुलकर्णी, सुषमा कवाडे, आशा चतुर, अरुणा राठोड, ममता देशकर, ज्योती गूजराम, राजेश इंगोले, विश्रांती डेंगरे, प्रमीला मनोहर, मालती आवटे, सुनंदा खडसे, अनिता भगत, रुषाली बोकडे, सुलभा तिरभाने, मिना ढोके यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.आश्वासनाची पूर्तता केव्हा ?निवडणुकीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. परंतु, त्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. शिवाय अंगणवाडी केंद्रांचे खाजगीकरण करण्याची धमकीच दिली जात आहे. केंद्र सरकारने २०११ नंतर एक रुपया मानधनात वाढ केलेली नाही. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रतीदिन वेतनासह पीएफ व ईऐसआय देण्याची घोषणा केली होती. परंतु, अजूनही तसा शासन आदेश निर्गमित करण्यात आला नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :Governmentसरकार