शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST

बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़

दुष्काळातही आबाळ : भाव अल्प; मदत गरजेचीसेलगाव (लवणे) : बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़ यंदाही निसर्गाच्या प्रकोपामुळे पिके हातची गेली़ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत आहे़ असे असताना शासन आत्महत्यांकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत़खरीप हंगामात पाऊस उशिरा व कमी आला़ अनियमित पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. एक महिना पावसाने दडी मारल्याने पिके वाळली़ उर्वरित पिकांची वाढ झाली नाही. यामुळे उत्पन्नात मोठी घट आली़ खर्चही निघाला नाही. सोयाबीन, भुर्इंमुंग, मुंग, उडीद या पिकांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता; पण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले़ तुरीनेही किडीच्या आक्रमणामुळे खाली मान टाकली. रब्बी हंगामही निसर्गावरच अवलंबून आहे. अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी खालावली असून विहिरी, नाले कोरडे पडत आहे. यामुळे ओलित कसे करायचे, रबी हंगामही हातचा जाणार काय आदी प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ शिवाय जनावरांना चारा आणायचा कुठून, हाही प्रश्नच आहे़ स्वत:सह गुरांची सोय लावणे कठीण होत असल्याने पुढील जीवन जगावे तरी कसे, या विंवचनेत शेतकरी सापडला आहे. नैराश्यातून आत्महत्या वाढत आहेत़ राज्य व केंद्र शासन मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ शासन, प्रशासन शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ भविष्यातील अडचणींचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)