शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शेतकरी आत्महत्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST

बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़

दुष्काळातही आबाळ : भाव अल्प; मदत गरजेचीसेलगाव (लवणे) : बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़ यंदाही निसर्गाच्या प्रकोपामुळे पिके हातची गेली़ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत आहे़ असे असताना शासन आत्महत्यांकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत़खरीप हंगामात पाऊस उशिरा व कमी आला़ अनियमित पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. एक महिना पावसाने दडी मारल्याने पिके वाळली़ उर्वरित पिकांची वाढ झाली नाही. यामुळे उत्पन्नात मोठी घट आली़ खर्चही निघाला नाही. सोयाबीन, भुर्इंमुंग, मुंग, उडीद या पिकांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता; पण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले़ तुरीनेही किडीच्या आक्रमणामुळे खाली मान टाकली. रब्बी हंगामही निसर्गावरच अवलंबून आहे. अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी खालावली असून विहिरी, नाले कोरडे पडत आहे. यामुळे ओलित कसे करायचे, रबी हंगामही हातचा जाणार काय आदी प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ शिवाय जनावरांना चारा आणायचा कुठून, हाही प्रश्नच आहे़ स्वत:सह गुरांची सोय लावणे कठीण होत असल्याने पुढील जीवन जगावे तरी कसे, या विंवचनेत शेतकरी सापडला आहे. नैराश्यातून आत्महत्या वाढत आहेत़ राज्य व केंद्र शासन मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ शासन, प्रशासन शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ भविष्यातील अडचणींचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)