शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

लॉकडाऊन काळात गरजूंना शासकीय धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसाखर, चणाडाळचा लाभ : तालुक्यात, ३४ हजार १३५ रेशन कार्डधारक, १२३ रेशन दुकाने

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आता गरिबांसोबतच मध्यमवर्गीय कचाट्यात सापडला आहे. स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे.तालुक्यात ८ हजार ११० अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. तर २१ हजार २५९ प्राधान्य गट कार्डधारक, २ हजार ७८१ शेतकरी कार्डधारक तर एपीएलचे १ हजार ९८५ असे एकूण २४ हजार १३५ शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत.या शिधापत्रिकाधारकांना शहरातील २५, तर ग्रामीण भागातील ९८ अशा १२३ रेशन दुकानातून धान्याचे वितरण केले जाते. शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागातर्फे मे महिन्यात अंत्योदय गटासाठी ८१.१० किलो चणाडाळ ४५ रुपये किलोप्रमाणे वितरित करण्यात आली, तर त्यावर एक किलो मोफत चणाडाळ या गटाला देण्यात आली. मोफत वितरणासाठी पुन्हा ८१.१० किलो चणाडाळ देण्यात आली, तर १ हजार ४१३.६५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले.मे आणि जून महिन्यासाठी अंत्योदयसाठी गहू २ हजार ४३२.४० किलो, तांदूळ ३ हजार २४३.२० किलो तर साखर १६२.५ किलोचा साठा अंत्योदयसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. प्राधान्य गटासाठी २०६.४० किलो चणाडाळ (४५ किलो भावाप्रमाणे) तर २१६.८५ किलो चणाडाळ आणि ४ हजार ३०८.८० किलो तांदूळ मोफत वितरणासाठी देण्यात आले होते. मे जून महिन्यासाठी ५ हजार १६२.०४ किलो गहू तर ३ हजार ४४१.३६ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला होता.शेतकरी गटासाठी ६६७.२४ किलो गहू, तर ४५८.१६ किलो तांदूळ मे जून महिन्याच्या वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. तर एपीएल गटासाठी २३०.८५ किलो गहू आणि १५३.९० किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे वितरण सुरू आहे. शासन निर्णयानुसार धान्य वितरणामुळे सर्वसामान्यांसह गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.शेतकरी आणि एपीएल रेशन मोफत धान्य नाहीमे महिन्यात आतापावेतो अंत्योदय ७ हजार ३५१ कार्डधारकांना, प्राधान्य गट १९ हजार ५३४, तर शेतकरी गटातील २ हजार २५४ कार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात जून महिन्याचे वितरण सुरू होईल.लॉकडाऊन काळात अन्नसुरक्षा योजना किंवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना मे व जून या दोन महिन्यांकरिता प्रत्येक व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यासाठी विस्थापितांची नावे घेण्यासाठी नगरपालिका आणि पंचायत समितीला निर्देश देण्यात आले असून त्यांची नावे आल्यावर त्या पद्धतीने धान्यसाठा विस्थापितांना मोफत वितरित केला जाणार आहे.- अनिल पाटील, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, आर्वी.

टॅग्स :Socialसामाजिक