शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

हमीभावात तूर खरेदी सुरू करण्याबाबत शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : तूर पिकांचा हमीभाव प्रति क्विंटल ५६७५ रूपये आहे. सध्या बाजारात नवीन तुरीचे भाव चार ...

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी ठप्प : शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : तूर पिकांचा हमीभाव प्रति क्विंटल ५६७५ रूपये आहे. सध्या बाजारात नवीन तुरीचे भाव चार हजाराच्या आसपास आहे. नवीन तूर बाजारात येणे सुरू झाले असून आठ-पंधरा दिवसात तुरीची आवक वाढणार आहे. खाजगी व्यापाऱ्यांना तूर विकून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या तुरी हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था केलेली नाही. आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू न झाल्याने शासन तूर खरेदी याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.शेतमाल बाजारात आले की त्याचे भाव पडतात व तो व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा झाला की मग भाव वाढतात. प्रत्येक शेतमालाबाबत हमीभाव जाहीर करायचा पण त्या भावाने माल खरेदी करण्याबाबत दिरंगाई करायची हे शासनाचे धोरण व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यावर्षी तूर खरेदीबाबत तोच अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. शासनाने तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल रू. ५६७५ निश्चीत केला आहे. नवीन तुरी बाजारात येणे सुरू झाले आहे. आठ-पंधरा दिवसात बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरी घरी आलेल्या असतील. तुर कापणी व मशीनद्वारे त्या काढणे याचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना त्या त्वरीत विकणे भाग पडत आहे. बाजारात सध्या तुरीला व्यापारी प्रतिक्विंटल ४००० ते ४४०० रूपयापर्यंत भाव देत आहे. शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतील आॅन लाईन नोंदणी हा पहिला टप्पाच अजून सुरू न केल्याने प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रूपयाचे आर्थिक नुकसान सहन करून गरजू शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. तसेच नोंदणी प्रक्रियाच सुरू झाली नाही त्यामुळे यंदा शासन खरेदी केंद्रे सुरू करते की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. शासनाने तुरीची शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे.

टॅग्स :Marketबाजार