शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेतीने अडकविली सरकारी विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

अनेक प्रमुख वाहतुकीचे रस्ते, नाल्या कंत्राटदारांनी खोदून ठेवल्याने वाहतुकीस रस्ते अयोग्य झाले आहे. नाल्या खोदून ठेवल्याने पावसाळ्यांत नागरीकांचे घरांत पाणी शिरण्याचा धोका आहे. २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊनमुळे विकास कामे ठप्प होती. आता काही अटी-शर्तीवर परवानगी दिली. सिमेंट, लोखंड, गिट्टी आदी उपलब्ध होते. मात्र कंत्राटदारांना वाळू उपलब्ध होत नाही.

ठळक मुद्देशहर, ग्रामीण भागातही परिणाम : लॉकडाऊन शिथीलतेनंतर स्थिती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहर व परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व नगर परिषदेतंर्गत विविध कंत्राटदारांची रस्ते, नाल्या, पुल ही विकासकामे सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने ही कामे अर्धवट स्थितीत आहे. सध्या या कामाला वाळू उपलब्ध नसल्याने अडचण वाढली आहे.अनेक प्रमुख वाहतुकीचे रस्ते, नाल्या कंत्राटदारांनी खोदून ठेवल्याने वाहतुकीस रस्ते अयोग्य झाले आहे. नाल्या खोदून ठेवल्याने पावसाळ्यांत नागरीकांचे घरांत पाणी शिरण्याचा धोका आहे. २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊनमुळे विकास कामे ठप्प होती. आता काही अटी-शर्तीवर परवानगी दिली. सिमेंट, लोखंड, गिट्टी आदी उपलब्ध होते. मात्र कंत्राटदारांना वाळू उपलब्ध होत नाही.वाळू घाटाचे लिलावही यावर्षी झाले नाही. त्यामुळे वाळूघाट बंद आहे. याच कारणाने खासगी घरांची बांधकामे बंद आहे. त्यामुळे बांधकाम मजूर, मिस्त्री, कुली, सेंट्रींगवाले, वायरमन, प्लंबर, ग्रेनाईट कटींग करणारे पुरुष व महिला मजूर कामे नसल्याने घरीच आहेत व लॉकडाऊनचे संकट तर आहेच. शिवाय बेरोजगारीने आर्थिक संकटात जिल्ह्यातील मजुरांची हजारो कुटुंबे त्रस्त आहे.वाळुघाट बंद असल्याने चोरीने अनेक नद्यांमधून दररोज वाळू उपसा सुरू असून १५००० रू. चा वाळू ट्रक २५००० रूपयांमध्ये नागरिकांना घ्यावा लागतो. वाळूघाट लिलाव लॉकडाऊनमुळे जूनपर्यंत होईल अशी चिन्हे नाही. त्यामुळे पावसाळ्यात नद्यांमध्ये पाणी भरेल व डिसेंबरपर्यंत रेती उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे जप्त रेतीचा लिलाव करून ती रेती कंत्राटदारांना उपलब्ध करून द्यावी, असाही एक पर्याय सुचविण्यात आला आहे.लोकोपयोगी विकास कामे, खासगी विकास कामांना, सरकारी विकास कामांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून त्वरीत रेती घाटावरून वर्क आॅर्डर झालेल्या सरकारी कामांना बांधकाम विभागाचे किती वाळू लागेल याचे प्रमाणपत्र घेऊन त्याप्रमाणे रॉयल्टी घेऊन तेवढी रेती प्राधान्यक्रमाने उपलब्ध करावी. जिल्ह्यात विविध तहसील, एस.डी.ओ. कार्यालय, पोलीस विभागात जप्त रेतीचा लिलाव करून ती वाळू देखील कंत्राटदारांना उपलब्ध करून द्यावी.- यशवंत झाडे, नगरसेवक तथा माकपा नेते, वर्धा. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsandवाळू