शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शासन आणि समाज यात एक सुदृढ नाते हवे- विनायक देशपांडे

By admin | Updated: January 12, 2016 01:49 IST

शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे.

कमलनयन बजाज परिसंवाद स्पर्धा : अमरावतीचा अनिरूद्ध महाजन प्रथम वर्धा : शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे. समाज सतत जागरूक असावयास हवा. त्याकरिता सुशिक्षितांचा त्यात सहभाग वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कार्यकारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. शिक्षा मंडल, वर्धा द्वारा आयोजित ४२ व्यास कमलनयन बजाज स्मृती आंतरविद्यापीठ परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अतिथी म्हणून ते बोलत होेते. यावेळी विचार व्यक्त करताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘शासन आणि समाज’ यामध्ये दरी वाढताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वाढणारे खाजगीकरण हे होय. आधुनिक समाजात माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. यामुळे इकॉनॉमिक्स बरोबरच इगोनॉमिक्सही वाढलेले दिसते. शासन व समाज यामधील दरी दूर करण्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात जा.ब. विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या चमूने सादर केलेल्या समारोप गीताने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षा मंडल, वर्धाचे उपाध्यक्ष भरत महोदय, सभापती संजय भार्गव, सहसचिव पुरूषोत्तम खेमुका, परीक्षक डॉ. अनिल ढगे, डॉ. अन्वर सिद्दीकी व परिसंवादाचे समन्वयक डॉ. शेषराव बावनकर उपस्थित होते.यावेळी संजय भार्गव यांच्यासह या स्पर्धेचे परीक्षक डॉ. अनिल ढगे व डॉ. अन्वर सिद्दिकी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी केले तर आभार डॉ. शेषराव बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षा मंडलचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी तथा शहरातील गणमान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(प्रतिनिधी)