शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शासन आणि समाज यात एक सुदृढ नाते हवे- विनायक देशपांडे

By admin | Updated: January 12, 2016 01:49 IST

शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे.

कमलनयन बजाज परिसंवाद स्पर्धा : अमरावतीचा अनिरूद्ध महाजन प्रथम वर्धा : शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे. समाज सतत जागरूक असावयास हवा. त्याकरिता सुशिक्षितांचा त्यात सहभाग वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कार्यकारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. शिक्षा मंडल, वर्धा द्वारा आयोजित ४२ व्यास कमलनयन बजाज स्मृती आंतरविद्यापीठ परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अतिथी म्हणून ते बोलत होेते. यावेळी विचार व्यक्त करताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘शासन आणि समाज’ यामध्ये दरी वाढताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वाढणारे खाजगीकरण हे होय. आधुनिक समाजात माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. यामुळे इकॉनॉमिक्स बरोबरच इगोनॉमिक्सही वाढलेले दिसते. शासन व समाज यामधील दरी दूर करण्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात जा.ब. विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या चमूने सादर केलेल्या समारोप गीताने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षा मंडल, वर्धाचे उपाध्यक्ष भरत महोदय, सभापती संजय भार्गव, सहसचिव पुरूषोत्तम खेमुका, परीक्षक डॉ. अनिल ढगे, डॉ. अन्वर सिद्दीकी व परिसंवादाचे समन्वयक डॉ. शेषराव बावनकर उपस्थित होते.यावेळी संजय भार्गव यांच्यासह या स्पर्धेचे परीक्षक डॉ. अनिल ढगे व डॉ. अन्वर सिद्दिकी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी केले तर आभार डॉ. शेषराव बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षा मंडलचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी तथा शहरातील गणमान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(प्रतिनिधी)