शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर

By महेश सायखेडे | Updated: September 10, 2022 15:07 IST

२ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त होताच तालुक्यांना होणार वळत

वर्धा : यंदा जिल्ह्यात जुलै अन् ऑगस्ट महिन्यांत अतिवृष्टीने कहरच केला. याच अतिवृष्टीमुळे २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील शेतकऱ्यांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार ६४६ इतकी असून त्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४५.९९ कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

याच प्रस्तावावर अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून शासनाने मंजुरीची मोहर लावली असून आता लवकरच जिल्हा प्रशासनाला हा निधी मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त होताच तो तालुकास्तरावर वितरित होणार आहे. त्यानंतरच शासकीय मदतीची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी समुद्रपूर तालुक्यात 

गत दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.तालुकानिहाय नुकसानीची स्थिती (हेक्टरमध्ये)वर्धा : ४०६९३.३३सेलू : २३९६३.७०देवळी : ३७२९३.६०आर्वी : ३००७५.७७आष्टी : १५०५५कारंजा : २६३४३.३८हिंगणघाट : ४५५८७.५२समुद्रपूर : ३५०८२.१०वाढीव दराप्रमाणे अपेक्षित तालुकानिहाय निधीवर्धा : ५५,५०,३७,२८८ रुपयेसेलू : ३२,६०,५७,२९६ रुपयेदेवळी : ५०,७२,२८,८०० रुपयेआर्वी : ४१,०१,४२,०९२ रुपयेआष्टी : २०,५२,८५,६०० रुपयेकारंजा : ३५,८२,६९,९६८ रुपयेहिंगणघाट : ६२,०८,२१,७४४ रुपयेसमुद्रपूर : ४७,७१,१६,५६० रुपयेनायब तहसीलदार सांभाळणार नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी 

* कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहून म्हणून तालुका स्तरावर नायब तहसीलदारांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी राहणार आहे. तर सहाय्यक म्हणून मंडळ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली जाणार आहे.* नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात शासकीय मदत वळती होताना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सोमवारी एलडीएम सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने पूर्व तयारी बैठक घेणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २.३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना वेळीच शासकीय मदत मिळावी म्हणून ३४५.९९ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला शुक्रवार ९ सप्टेंबरला शासनाने मंजुरी दिली आहे. तर लवकरच जिल्हा प्रशासनाला निधी मिळणार असून निधी प्राप्त होताच तो तातडीने तालुक्यांना वळता होणार आहे. 

- राहूल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी