शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

गोदरीमुक्त तालुका दिवास्वप्नच ठरणार

By admin | Updated: December 30, 2014 23:41 IST

निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम

सेलू : निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम अभियानाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ यामुळे सेलू तालुका गोदरीमुक्त होण्याचे स्वप्न दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे़ घर तेथे शौचालय अशी शासनाची योजना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे़ ही योजना अतिक्रमणात वर्षानुवर्षापासून रहिवासी असणाऱ्या परिवारापासून दूर असल्याने गाव गोदरीमुक्त कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ गुड मॉर्निंग पथकाची कामगिरी उल्लेखनीय असली तरी गावात हे पथक असेपर्यंतच गाव गोदरीमुक्त झाल्याची प्रचिती येत आहे़ हे पथक त्या गावात जाणे बंद होताच जुनीच परिस्थिती पाहायला मिळत आहे़काही गावांत ऐन शाळेसमोर वा शाळेच्या पटांगणात तर काही ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या बाजुलाच गोदरी असल्याचे दिसून येते़ यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आजही गावालगतचा परिसर गोदरीमुक्त झाला नसल्याचे वास्तव आहे़ काही वर्षांपूर्वी बहुतांश गावांत ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले़ आमचे गाव हागणदारीमुक्त झाल्याचे फलक गावाच्या सिमेवर लावून पुरस्कार मिळविले़ या गावात घर तेथे शौचालय झाले; पण गोदरीपासून मुक्तता झाली नाही़ काही गावांत दंडात्मक कारवाईच्या सूचनांचे फलक लावलेत; पण ते फलकच गोदरीच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे़सेलू पं़स़ कार्यालयापासून बोरधरणपर्यंत जाणाऱ्या मार्गावर घोराड, किन्ही, मोही, हिंगणी, बोरी ही गावे गोदरीमुक्त झाली नाहीत़ अशी अनेक गावे अद्याप हागणदारीमुक्त होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येते़(शहर प्रतिनिधी)