शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गोदरीमुक्त तालुका दिवास्वप्नच ठरणार

By admin | Updated: December 30, 2014 23:41 IST

निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम

सेलू : निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम अभियानाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ यामुळे सेलू तालुका गोदरीमुक्त होण्याचे स्वप्न दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे़ घर तेथे शौचालय अशी शासनाची योजना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे़ ही योजना अतिक्रमणात वर्षानुवर्षापासून रहिवासी असणाऱ्या परिवारापासून दूर असल्याने गाव गोदरीमुक्त कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ गुड मॉर्निंग पथकाची कामगिरी उल्लेखनीय असली तरी गावात हे पथक असेपर्यंतच गाव गोदरीमुक्त झाल्याची प्रचिती येत आहे़ हे पथक त्या गावात जाणे बंद होताच जुनीच परिस्थिती पाहायला मिळत आहे़काही गावांत ऐन शाळेसमोर वा शाळेच्या पटांगणात तर काही ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या बाजुलाच गोदरी असल्याचे दिसून येते़ यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आजही गावालगतचा परिसर गोदरीमुक्त झाला नसल्याचे वास्तव आहे़ काही वर्षांपूर्वी बहुतांश गावांत ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले़ आमचे गाव हागणदारीमुक्त झाल्याचे फलक गावाच्या सिमेवर लावून पुरस्कार मिळविले़ या गावात घर तेथे शौचालय झाले; पण गोदरीपासून मुक्तता झाली नाही़ काही गावांत दंडात्मक कारवाईच्या सूचनांचे फलक लावलेत; पण ते फलकच गोदरीच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे़सेलू पं़स़ कार्यालयापासून बोरधरणपर्यंत जाणाऱ्या मार्गावर घोराड, किन्ही, मोही, हिंगणी, बोरी ही गावे गोदरीमुक्त झाली नाहीत़ अशी अनेक गावे अद्याप हागणदारीमुक्त होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येते़(शहर प्रतिनिधी)