शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

‘गोट मार्केट’चा प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाखांच्यावर शेळी आहेत. इतकेच नव्हे तर शेळीपालकांची संख्याही मोठी आहे. अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. वर्धा जिल्ह्यात पाहिजे तशी मोठी बाजारपेठ नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तसेच अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी विक्रीसाठी जावे लागते.

ठळक मुद्देजागा मिळाली। निधी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात नव्हे तर राज्यासाठी आदर्श ठरणारा शेळींच्या बाजारपेठ निर्मितीचा विषय सध्या रेंगाळला आहे. तब्बल दोन वर्षानंतर सदर बाजारपेठ कुठे उभारावी यासाठी जागा निश्चित करण्यात आली. शिवाय त्यानंतर १५ कोटींच्या निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला. परंतु, पाठविण्यात आलेल्या या सुमारे ४० पानांचा प्रस्ताव सध्या शासन दरबारी धुळखात असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवर शेळीपालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. सदर प्रस्तावाला तातडीने गती मिळावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेळीपालकांना आहे.वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाखांच्यावर शेळी आहेत. इतकेच नव्हे तर शेळीपालकांची संख्याही मोठी आहे. अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. वर्धा जिल्ह्यात पाहिजे तशी मोठी बाजारपेठ नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तसेच अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी विक्रीसाठी जावे लागते. वर्धा जिल्ह्यातील शेळीपालकांना शेळी विक्रीसाठी जिल्ह्यातच चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी त्या दिशेने पाऊल टाकले. गोट मार्केटसाठी सुरूवातीला शोधत असताना देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला आठवड्यातून एक दिवस देवळीतच जागा उपलब्ध करून देण्यासाठी विचारणा करण्यात आली. परंतु, त्यांनी पुलगाव येथे जागा देतो असे सांगितल्याने देवळी शहराशेजारी शासकीय जागा आहे काय याचा शोध घेण्यात आला. याच शोध मोहिमेदरम्यान कार्यकाळ संपल्याने डॉ. सतीश राजू यांची वर्धा येथून नागपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली.त्यानंतर गोट मार्केटचा विषय थंडबस्त्यात पडला. परंतु, त्यानंतर एका अधिकाऱ्याने पुढाकार घेत विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असता सुमारे दीड वर्षांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारने सालोड (हिरापूर) येथे जागा मिळाली. त्यानंतर १५ कोटींचा निधी सदर गोट मार्केटच्या निर्मितीसाठी लागत असल्याने व त्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन सहज निधी उपलब्ध करू शकत नसल्याने निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव पाठवून सुमारे चार महिन्यांच्यावर कालावधी लोटूनही त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. इतकेच नव्हे तर कुठलाही लोकप्रतिनिधी त्याविषयी वाच्छता करीत नसल्याने शेळी पालन करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.देवळीतील जागा निघाली वनविभागाचीसदर गोट मार्केट विदर्भासह महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार असल्याने ही बाजारपेठ देवळी येथे व्हावी अशी इच्छा एका लोकप्रतिनिधीने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यानंतर देवळी परिसरातील इसापूर येथील एक जागा निश्चित करण्यात आली. परंतु, ती जागा वन विभागाची असल्याने आणि ती सहज मिळत नसल्याचे पुढे आल्याने दुसºया जागेचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आमदार आदर्श गाव असलेल्या सालोड (हिरापूर) शिवारातील महसूल विभागाच्या एका जागेवर जिल्हाधिकाºयांकडून शिक्का मोर्तब करण्यात आला. तेथे गोट मार्केटसाठी २ हेक्टर जागा तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपलब्ध करून दिली आहे.शाश्वत दर मिळणारशेळी पालकांना जिल्ह्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेळीपालकांचा मोठ्या बाजारपेठेपर्यंत जाण्याचा त्रास कमी होणार असून त्यांना शाश्वत दर मिळणार आहे. इतकेच नव्हे तर गोट मार्केटच्या प्रस्तावात शेळींचा सुसज्य आठवडी बाजार, शेळी प्रजनन केंद्र व पशुविज्ञान केंद्राचा समावेश राहणार असल्याने सदर प्रस्ताव पुर्णत्त्वास गेल्यास वर्धा जिल्हा शेळीपालन व्यवसायासाठी ‘आयडल’ ठरणार आहे.शेतकरी हित जोपासण्याच्या उद्देशालाच बगल?शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी वर्ध्याची ओळख. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवून शेतीला पुरक व्यवसायाची जोड देत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आदर्श गोट मार्केटची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, सदर विषय सध्या रखडला असल्याने शेतकरी हित जोपासण्याच्या उद्देशालाच बगल मिळत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Marketबाजार