शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

वैश्विक पदयात्रेकरूंनी राष्ट्रपित्याला केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

गांधीजींनी समाजातील शेवटच्या मानसाचा विचार केला आहे. बापूंनी सुशासन सांगताना स्वशासन या बद्दल जे सांगितले, ते महत्त्वाचे आहे. जो स्वशासनवर निष्ठा ठेवतो आणि वागतो तोच सुशासन निर्माण करू शकतो. त्यामुळे सुशासनची अपेक्षा करायची असेल तर सुरूवात आपल्या पासून करावी लागेल. सत्याकडे पाहण्याचा आपापला दृष्टिकोन आहे.

ठळक मुद्देशांती भवनात समारोप कार्यक्रम : आश्रम प्रतिष्ठानतर्फे यात्रेकरूंचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : वैश्विक पदयात्रेचा समारोप येथील शांतीभवन येथे झाला. यात्रेकरुंनी बापुकूटीची माहिती जाणून घेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले.गरीबी निर्मूलन, हिंसामुक्ती, समानता व न्याय आणि जल-वायू परिवर्तन हे चार मुद्दे घेऊन बा-बापू यांच्या १५० व्या जयंतीअंतर्गत निघालेली वैश्विक पदयात्रा गांधीजींच्या पुण्यतिथीला नई तालिम समिती परिसरात पोहोचली. आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व पदयात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. तसेच सायंकाळी आश्रम परिसरात आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी यात्रेकरुंचे स्वागत केले. शांतीभवन येथील कार्यक्रमाला एकता परिषदचे संस्थापक डॉ. राजगोपाल, पी. व्ही. बालभाई, मिनाक्षी नटराजन, मिलून कोठारी, रेवा जोशी, निकोलस बार्ला, गौतम राणा आदी हजर होते.जगात शांती, न्यायाची भावना निर्माण व्हावी : बालभाईमहात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी दिल्ली येथून निघालेली पदयात्रा गांधींच्या पुण्यतिथीला सेवाग्रामला पोहचली. या यात्रेत ५० नागरिक सहभागी आहे. विश्वशांती यात्रेच्या माध्यमातून गांधीजींचे विचार पोहचविण्याचे काम होत आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आहे या यात्रेचा भाग होण्याची.यात्रेला जय जगत असेही नाव दिले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी जय जगतचा नारा दिला. या मागील जी भावना आहे, ती लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. या यात्रेतून देशातच नव्हे तर जगात शांती, न्यायाची भावना निर्माण व्हावी, असे यावेळी बालभाई यांनी सांगितले.आजचे सरकार संदूक आणि बंदुकीवर चालत आहे- मीनाक्षी नटराजनगांधीजींनी समाजातील शेवटच्या मानसाचा विचार केला आहे. बापूंनी सुशासन सांगताना स्वशासन या बद्दल जे सांगितले, ते महत्त्वाचे आहे. जो स्वशासनवर निष्ठा ठेवतो आणि वागतो तोच सुशासन निर्माण करू शकतो. त्यामुळे सुशासनची अपेक्षा करायची असेल तर सुरूवात आपल्या पासून करावी लागेल. सत्याकडे पाहण्याचा आपापला दृष्टिकोन आहे. आजचे सरकार हे संदूक आणि बंदुकीवर चालत आहे. गांधीजींनी बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश दिला. सध्या हिंसा आणि भयमुक्त वातारण आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी हे शासक नसून सेवक आहे हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे. चांगल्या वातावरणासाठी गांधीजींच्या अहिंसेचा मार्ग स्विकारला पाहिजे, असे मीनाक्षी नटराजन यांनी सांगितले.गांधी जयंतीदिनी समारोपभारतातील पदयात्रेचा समारोप झाला आहे. या यात्रेत ५० व्यक्तींचा समावेश आहे. ११ हजार कि.मी. आणि ३६५ दिवसांची ही यात्रा असून सयुंक्त राष्ट्रसंघात निवेदन देण्यात येणार आहे. जिनेवा या ठिकाणी गांधीजींच्या जयंतीदिनी समारोप होणार आहे. स्पेन मधून निघालेली दुसरी वैशिष्ट्य पदयात्रेत सहभागी पदयात्रेकरूंना भेटण्यासाठी सेवाग्रामला आले आहेत. विशेष म्हणजे या यात्रेत देशातील विविध राज्यातील देवाशीस, मुरली, खशबू चौरसिया, नीरू दिवाकर, मुदीत श्रीवास्तव, आशिमा, जयसिंह जादौन, पार्थ, अजित, सन्नी कुमार, श्रृती तसेच भारत व १४ देशातील मुला-मुली सहभागी झाले आहेत.

टॅग्स :tourismपर्यटन