शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 20:28 IST

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमेचे बहारतर्फे वर्धानगरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेला सेवाग्राम आश्रम जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देतो, शिवाय प्रचंड वेगाने मानवाकडून होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे, हा जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा संदेशही सेवाग्राम आश्रम देतो. म्हणूनच सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही इको-प्रोद्वारे या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी सेवाग्राम आश्रमाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली.इको-प्रो, चंद्रपूर या संस्थेद्वारे १ मेपासून राज्यात महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमा आयोजित केली होती. या परिक्रमेचा समारोप सेवाग्राम आश्रमात करण्यात आला. तत्पूर्वी या यात्रेचे स्वागत ऐतिहासिक वास्तू असलेल्या मगन संग्रहालयातील कुमारप्पा भवनात करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विभा गुप्ता होत्या. यावेळी, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे यांची प्रमुख उपस्थित होती. साडेचार हजार किलोमीटरची मोटरसायकलवर परिक्रमा करीत राज्यातील अनेक गड-किल्ले, परकोट, ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्यांना भेट देत 'आपला वारसा आपणच जपूया' हा संदेश या यात्रेने दिला.ऐतिहासिक वास्तू या भूतकाळ आणि भविष्याशी नाते सांगतात. आपला वारसा आपणच जपावयास पाहिजे, असे मनोगत बंडू धोत्रे यांनी केले. ते पुढे म्हणाले, संबंधित सरकारी विभागांकडे पैसा आहे पण इच्छाशक्ती नाही. गड-किल्ल्यांच्या संवर्धन संदर्भात धोरणांचा अभाव आहे. म्हणूनच जय भवानी, जय शिवाजीच्या पुढे जाऊन हा वारसा जतन करण्याची गरज आहे. शासन उदासीन असून आपणच पुढे आले पाहिजे, असेही धोत्रे म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन दीपक गुढेकर यांनी केले तर आभार अविनाश भोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बहार नेचर फाउंडेशनचे सचिव दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, दर्शन दुधाने, पवन दरणे, राजेंद्र लांबट, राहुल वकारे यांनी परिश्रम घेतले. सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन या परिक्रमेचा समारोप करीत ही यात्रा चंद्रपूरला रवाना झाली

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी