शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 20:28 IST

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमेचे बहारतर्फे वर्धानगरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेला सेवाग्राम आश्रम जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देतो, शिवाय प्रचंड वेगाने मानवाकडून होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे, हा जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा संदेशही सेवाग्राम आश्रम देतो. म्हणूनच सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही इको-प्रोद्वारे या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी सेवाग्राम आश्रमाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली.इको-प्रो, चंद्रपूर या संस्थेद्वारे १ मेपासून राज्यात महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमा आयोजित केली होती. या परिक्रमेचा समारोप सेवाग्राम आश्रमात करण्यात आला. तत्पूर्वी या यात्रेचे स्वागत ऐतिहासिक वास्तू असलेल्या मगन संग्रहालयातील कुमारप्पा भवनात करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विभा गुप्ता होत्या. यावेळी, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे यांची प्रमुख उपस्थित होती. साडेचार हजार किलोमीटरची मोटरसायकलवर परिक्रमा करीत राज्यातील अनेक गड-किल्ले, परकोट, ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्यांना भेट देत 'आपला वारसा आपणच जपूया' हा संदेश या यात्रेने दिला.ऐतिहासिक वास्तू या भूतकाळ आणि भविष्याशी नाते सांगतात. आपला वारसा आपणच जपावयास पाहिजे, असे मनोगत बंडू धोत्रे यांनी केले. ते पुढे म्हणाले, संबंधित सरकारी विभागांकडे पैसा आहे पण इच्छाशक्ती नाही. गड-किल्ल्यांच्या संवर्धन संदर्भात धोरणांचा अभाव आहे. म्हणूनच जय भवानी, जय शिवाजीच्या पुढे जाऊन हा वारसा जतन करण्याची गरज आहे. शासन उदासीन असून आपणच पुढे आले पाहिजे, असेही धोत्रे म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन दीपक गुढेकर यांनी केले तर आभार अविनाश भोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बहार नेचर फाउंडेशनचे सचिव दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, दर्शन दुधाने, पवन दरणे, राजेंद्र लांबट, राहुल वकारे यांनी परिश्रम घेतले. सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन या परिक्रमेचा समारोप करीत ही यात्रा चंद्रपूरला रवाना झाली

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी